प्रतिनिधी/ रत्नागिरी
लॉकडाऊन ही कला आहे आणि तो उठवणे ही कला आहे, असे वाटत नाह़ी हे राज्य सरकार कोरोनाविरोधी लढय़ासाठी कमी पडल़े झोपी गेलेल्यांना जागे करता येऊ शकत़े परंतु सोंग घेतलेल्यांना असे करता येत नाह़ी रत्नागिरीत कोरोना प्रयोगशाळा व्हावी म्हणून तीन महिन्यांपूर्वी पत्र दिले होत़े सरकारला आता जाग आल़ी प्रयोगशाळा लवकर झाली असती तर बर झाल असत अशा शब्दात भाजपा नेते व आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल़ी
मोदी सरकारच्या दुसऱया टप्प्यातील वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजेश सावंत, सचिन वहाळकर, उमेश कुलकर्णी, ऍड. ा़विलास पाटणे आदी उपस्थित होत़े
आमदार लाड म्हणाले कोव्हिडचा फटका बसलेल्या 14 देशांची एकत्रित लोकसंख्या भारताएवढी आह़े त्या देशांमध्ये संसर्गाचे प्रमाण 22.5 पट होत़े मृत्यूची संख्या ही 55.2 पट इतकी आह़े वेळीच लागु केलेल्या टाळेबंदीमुळे वैद्यकीय सुविधा व रूग्णांवर उपचार योग्य प्रकारे होऊ शकल़े
ते म्हणाले माजी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचा दापोली दौरा म्हणजे पर्यटन आह़े, अशी टीका करणाऱया मंत्री उदय सामंत यांच्या बालबुद्धीची किव करावीशी वाटत़े 20 लाख कोटी रूपये एवढे पॅकेज केंद्रसरकारने जाहीर केल़े त्यापैकी नेमका किती भाग रत्नागिरी, सिंधुदुर्गला मिळाला हे आताच सांगता येणार नाह़ी त्यासाठी सरकारकडे मागणी केली पाहिज़े लघुउद्योजकांना दिलासा देणारे आत्मनिर्भर पॅकेज लागू करण्यात आले आह़े त्याचा लाभ रत्नागिरी जिह्यातील लोकांना निश्चितपणे होईल़