ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा ग्राफ खाली येताना दिसत आहे. मागील 24 तासात राज्यात 29 हजार 644 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर एकूण 44 हजार 493 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 55 लाख 27 हजार 092 वर पोहचली आहे.
दरम्यान, कालच्या दिवशी 555 जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 86 हजार 616 वर पोहचला आहे. महाराष्ट्र आतापर्यंत 50 लाख 70 हजार 801 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे होण्याचे प्रमाण 91.74 % इतके आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.57 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 3 लाख 67 हजार 121 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 24 लाख 41 हजार 776 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17.04 % रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 27 लाख 94 हजार 457 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, 20 हजार 946 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.