प्रतिनिधी / कोल्हापूर
कार्यक्षमता वाढावी या उद्देशाने पंचायत राज व्यवस्थेतील लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्हा परिषेदअतंर्गत येणाऱया सर्व विभागातील 34 हजार 799 जणांचा प्रशिक्षण घेणाऱयांमध्ये समावेश आहे. कसबा बावडा येथील ग्रामसेवक टेनिग सेंटर येथे आत्मा संस्थेतील टिमकडून बुधवार 4 ते 11 नोव्हेंबर दरम्यान हे प्रशिक्षण वर्ग चालवले जाणार आहेत.
पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या तीन टप्प्यात कामकाज चालते या रचनेतून केंद्र, राज्य सरकारच्या विविध विकास योजना धोरणे राबवली जातात. समाजातील शेवटच्या घटगापर्यंत ही माहिती पोहचली पाहिजे यावर सरकारचा भर राहिला आहे. या संस्थांच कामकाज अधिकाअधिक परिणाम कारक होणे अपेक्षित असते. ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असणारा निधीचा स्त्रोत, केंद्र, राज्य सरकारकडून येणाऱया विविध योजनांचे अभिसरण करुन ग्रामपंचायत विकास आराखडा परिपूर्ण होण्यासाठी विविध प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी हे प्रशिक्षण महत्वाचे मानले जाते.
यांना दिले जाणार प्रशिक्षण
प्रशिक्षणार्थी संख्या
लोकप्रतिनिधी 67
खाते प्रमुख 20
तालुका पातळीवरील छाननी समिती 120
विस्तार अधिकारी 134
पर्यवेक्षिका 134
सरपंच, ग्रामसेवक 1888
पंचायत समिती सदस्य, अधिकारी 600
ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी 16500
ग्रामस्थरी समिती, सदस्य 15450
एकुण 34779
—-
4 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत प्रभारी अधिकारी, विस्तार अधिकारी यांना तर 9 ते 12 नोव्हेंबर दरम्यान एकात्मिक विकास योजना यांचे प्रशिक्षण असणार आहे. ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षण होणार आहे. अशी माहिती सचिन शिरदवाडे यांनी दिली.
सहभाग बंधनकारक
ग्रामस्वराज अभियान 2020-21 अंतर्गत हे प्रशिक्षण होत आहे. या प्रशिक्षणात सर्व अधिकारी, कर्मचाऱयांनी सहभाग नोंदवणे बंधनकारकर आहे. टाळाटाळ करु नये.
अमन मित्तल
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.