विठ्ठल बिरंजे / कोल्हापूर
कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती थेट शेतकर्यांना मिळावी, त्याच बरोबर उत्पादन वाढीसाठी थेट प्रात्यशिकाद्वारे मार्गदर्शन करण्यासाठी यंदापासून राज्यात ‘कृषी संजीवनी’ सप्ताहाचे आयोजन केले आहे. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १ जुलै कृषीदिनी शुभारंभ होणार असून ७ जुलैपर्यंत शेतकर्यांचे प्रबोधन होणार आहे. विशेष म्हणचे कोविड-१९ च्या नियमांचे पालन करती कृषी विभागातील अधिकारी, कृषी तज्ञ माहिती देण्यासाठी शेतकर्यांच्या बांधावर जाणार आहेत.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली. त्यांच्या कार्याची सदैव स्मरण रहावे यासाठी १ जुलै जन्मदीन कृषी दिन म्हणून दर वर्षी साजरा करण्यात येतो. यंदापासून एक दिवसाऐवजी सात दिवस कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. कृषी व कृषी संल्गन असलेले पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्यव्यवसाय, रेशीम उद्योग, महिला आर्थिक विकास महामंडळ, खादी ग्रामोद्योग सहकार, ग्रामविकास, पणन आदी विभागाच्या सहकार्याने हा सप्ताह व शासनाच्या योजना शेतकर्यांपर्यंत पोहचवा असे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहेत. कृषी विद्यापीठ, केंद्रीय संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्र यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे.
अशी होणार अंमलबजावणी
गाव बैठका, शिवार भेटी, शेतीशाळेचे आयोजन
शेतकर्यांसोबत गावात कृषी विषयक राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना भेटी
कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी, नाविन्यपूर्ण, प्रयोगशिल, उल्लेखनिय काम करणार्या शेतकर्यांच्या सत्काराचे आयोजन
विविध पीक स्पर्धा आणि पुरस्कारांचा प्रचार
जलयुक्त शिवार, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
घडी पत्रिका, हस्त पत्रिका, भिती पत्रिकांचे वाटप करणे
आधुनिक तंत्रज्ञान म्हणी, घोष वाक्यातून प्रसार
या विषयी होणार मार्गदर्शन
पीक उत्पादकता वाढवणे, उत्पादन खर्च कमी करणे
पीक विमा योजना, हवामान आधारीत फळ विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना
जमीन आरोग्य पत्रिका, कृषी विकास योजना मार्गदर्शन
मका पिकावयील लष्कर आळी, बोंड आळी,
कडधान्य आंतरपीक व्यवस्थापन
बहुपीक पद्धत, एकात्मिक शेती पद्धत, हीरवा चारा निर्मिती
फळबाग लागवड, जलसंधारण आणि व्यवस्थापन
शेतकरी सक्षम करणे हेच ध्येय
शेतकरी सक्षम करण्यासाठी त्याला कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी मार्गदर्शन करणे यासाठी विविध पातळीवर सरकारचे प्रयत्न आहेत. कृषी संजिवनी सप्ताहाच्या निमित्ताने शेतकऱयांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहेत.
ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा कृषी अधिक्षक