प्रतिनिधी / कसबा बीड
कोगे-कुडित्रे दरम्यान असणारा जुना पूल धोक्याच्या पातळीकडे जात आहे. करवीर तालुक्यातील कोगे गावातील कोगे-कुडित्रे दरम्यान जुन्या पद्धतीचा पाणी आड़वण्याच्या उद्देशाने बांधला होता. जवळपास 50 वर्षांपूर्वीचा हा बंधारा. या बंधार्याने कोगेपासून मल्हारपेठ सावर्डे-कळे धरणापर्यंत सर्व शेतकरी वर्ग आज तागायत शेती करत आहे. अविरतपणे या बंधार्याने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले. त्यामध्ये कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्यास वाहतुकीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. पण आज या बंधाऱ्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
कुडित्रे गावाच्या बाजूस लागून या बंधाऱ्यात पुराच्या पाण्यामुळे मोठे भगदाड पडले आहे. त्यास पिचिंगची गरज आहे. जर पिचिंग झाले नाही, तर कोगे पासून कळेपर्यंत जवळपास 10 गावांचा पिण्याच्या व शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न होऊ शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, अशी नागरिकातून भावना व्यक्त होत आहे.