खोची/वार्ताहर
खोची परिसरात आज, बुधवारी सायंकाळी गारपीटसह पावसाने दमदार हजेरी लावली. गेले चार दिवस हुलकावणी देत असलेल्या वळीव पावसाने अखेर हजेरी लावल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे गारवा मिळाला. मात्र शेतकर्यांची चांगलीच धांदल उडाली.
उन्हाच्या कडाक्याने गेले काही दिवस लाहीलाही होत होती. मात्र आज झालेल्या या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण केला. हा पाऊस भरणी केलेल्या ऊसाला अत्यंत पोषक तसेच पोटरीला आलेल्या उन्हाळी ज्वारी पिकाला कणसे भरण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे सायंकाळनंतर लॉकडाऊन उठावदार दिसून आले. या पावसामुळे पाच वाजल्यापासून खोचीसह परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.