प्रतिनिधी/गारगोटी
वाघापूर ता.भुदरगड येथे शेताकडे वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकर्यावर गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी रघुनाथ गोविंद दाभोळे हे गंभीर जखमी झाले. जखमी दाभोळे यांना उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गेले तीन ते चार दिवस निढोरी -वाघापूर दरम्यानच्या परिसरात गव्याचा वावर आहे. दोन-तीन दिवस गव्याने येथेच तर ठोकलेला असल्याने शेतकर्यांच्यात घबराट पसरली आहे. आज सकाळी आठ वाजता वाघापूर येथील शेतकरी रघुनाथ गोविंद दाबळी ( वय ६०)हे जनावरांना वैरण आणण्यासाठी ओढ्या नजीकच्या रांग नावाच्या शेतात गेले होते. अचानक पिकामध्ये दबा धरून बसलेल्या गव्याने दाभोळे यांच्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
हल्यानंतर गव्याने निढोरी (ता. कागल) कडे धूम ठोकली. यावेळी शेतीला पाणी पाजत असलेल्या निढोरीतील शेतकऱ्यावरही गव्याने हल्ला केला असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले. या परिसरात मका पिक आहे. अमाप उत्पादनात त्याच बरोबर पाण्याचेही व्यवस्था असल्यामुळे गेले तीन ते चार वर्षे फेब्रुवारीनंतर गवे मुदाळच्या पुढच्या डोंगरातून खाली उतरून सूतगिरणी मार्गे वाघापूर निढोरी परिसरात येतात. वनविभागाने या गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या होत आहे
दैव बलवत्तर…
गवा दाभोळे यांच्यावर चाल करून चालल्याचे आजुबाजूच्या शेतकर्यांनी पाहून आरडाओरड केली. परतुं वैरण कापण्यात गुंग असल्याने दाभोळे यांना ऐकू आले नाही. सुमारे चार-पाच मिनिटं गव्यांचा हल्ला सुरू होता. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच दाभोळे यांचा जीव वाचला.