प्रतिनिधी / शिरोळ
कोरोनाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून करीत असलेली सेवा आणि पुराच्या कालावधीत सात तरूणांचे प्राण वाचवून कुंटूबांना जीवदान दिल्याबद्दल औरवाड ( ता. शिरोळ ) येथील वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते लाईप किट देवून सत्कार करण्यात आला. वजीर फोर्सच्या जवानांचे शिरोळ तालुक्यातील कार्य कौतुकास पात्र असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी यावेळी सांगितले.
वजीर रेस्क्यूचे जवान गेली 14 वर्षे शासनाच्या तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. महापुराच्या पार्श्वभुमीवर संकटकाळातील नागरिकांना आधार देणे, शासनच्या कॉलवर अवघडातील अवघड कामे करणे, लोकांचे जीव वाचवणे याचबरोबर विहिरीच्या किंवा पुराच्या पाण्यात मयत झालेल्या नागरीकांचा शोध घेणे अशी कामे हे जवान करत आहेत.
या व्यतिरिक्त कोरोनाने ज्यांचा मृत्यू होतो. त्याला दहन किंवा दफन करण्यासाठी कुणीच नाही अशा व्यक्तींच्या शवाला अत्यंसंस्कार करण्याचे कामही फोर्स कडून केली जात आहेत. जवानांच्या अशा समाजकार्याची दखल घेत तहसिल कार्यालयाच्या दालनात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लाईफ कीट देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी तहसिलदार आपर्णामोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, रेस्क्यू फोर्सचे अब्दुल रौप पटेल, अल्ताफ मुल्ला, सागर सुतार , मुज्जमिल पटेल, तोहित मुल्ला रोहित आंबी, नसीम पटेल, सद्दाम बहाद्दूर, अझर पटेल, अली मोमीन यांच्यासह दिपक वास्कर, उत्कर्ष खोत, राहुल गौरवाडे, वैभव वास्कर, महेश कदम, रोहन चौगुले उपस्थित होते.