ऑनलाईन टीम / तरुण भारत
सुमारे २१ दिवस सुरु असलेला एस टी संप अद्याप संपुर्णपणे मिटला नसुन एस टी कर्मचाऱ्यांमध्ये राज्य शासनाने आपल्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करुन आमच्या मागण्या मान्य करा अशा मागण्या संपकरी करत आहेत. यासाठी शासन आणि संपकरी यांच्यात गेले काही दिवस वाटाघाटी सुरु आहेत. यात शासनाला काही प्रमाणात यश मिळावे असुन कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कर्मचारी शासनाच्या भुमिका मान्य न करत पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. तर काही एसटी कर्मचारी कामावर हजर होत आहेत. यामुळे कोल्हापूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये फूट पडली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक वगळता जिल्ह्यातील इतर बस स्थानकावरील एसटी सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. तर एस टी कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याने कागल बस स्थानकात शुकशुकाट आहे. तसेच आंदोलनाची दिशा कोणती संघटना नाही तर एसटी कर्मचारी ठरवणार असल्याचे ही कर्मचाऱ्यांनी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले आहे.
त्यामुळे राज्यशासन एसटी कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक ती सर्व तडजोड करण्याचा प्रयत्न करत आहे. तर एस टी कर्मचाऱ्यांनी ही याबाबतीत सामंजस्याची भुमिका घ्यावी असा प्रयत्न राज्यशासन ही करते आहे. त्यामुळे आता एस टी कर्मचारी आपल्या निर्णयात तडजोड करतात की आहे तीच भुमिका रेटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.