प्रतिनिधी / कोल्हापूर :
पश्चिम घाट आणि कोकणाला जोडणारा कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गचे काम बराचकाळ प्रलंबित राहिले आहे. या रेल्वेमार्गामुळे येथील व्यवसाय, विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गा कार्यान्वीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन द्या, अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार संजय मडंलिक यांनी केली आहे.
कोल्हापूरच्या प्रलंबीत रेल्वे मागण्यांसदर्भात खासदार मंडलिक यांनी रेल्वेमंत्री वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कोल्हापूर रेल्वे संदर्भातील विविध मुद्यांवर त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी मंत्री वैष्णव यांनी कोल्हापूर रेल्वे संदर्भात व्यक्तीगत लक्ष घालून मागण्या प्रामुख्याने पुर्ण करु, असे आश्वासन दिले. याप्रसंगी खासदार मंडलिक यांच्यासोबत शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे उपस्थित होते.
चर्चेदरम्यान खासदार मंडलिक म्हणाले, पश्चिम घाट आणि कोकण परिसराच्या विकासासाठी कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वेमार्गाची उभारणी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र या रेल्वेमार्गाचे काम बऱयाच दिवसापासून प्रलंबीत आहे. या रेल्वेमार्गाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा. तसेच कोल्हापूर शहरानजीक गांधीनगर हे व्यापारी केंद्र आहे. याठिकाणी मुडशिंगीसह आसपासच्या गावातील नागरिकांना यायचे झाल्यास त्यांना राष्ट्रीय महामार्गावरुन दहा किमीचे अंतर फिरुन यावे लागते. यासाठी लोहिया मार्केट येथे बोगदा अथवा नविन तंत्रज्ञान वापरुन रेल्वे गेट बसवण्यात यावे, अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केली आहे.
कोल्हापूर–पुणे रेल्वे वेगवान करा
कोल्हापूर-पुणे रेल्वेने प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रेल्वेला हा मार्ग व्यावसायिक दृष्टÎा फायदेशीर आहे. यासाठी कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी ट्रेन सुरु करण्यात यावी. तसेच सध्याच्या ट्रेनचा प्रवास योग्य वेळेच्या वेगात व्हावा याकरीता कोल्हापूर-पुणे रेल्वे वेगवान करण्याची गरज आहे.
कोल्हापूर–अमृतसर रेल्वे सुरु करा
पर्यटकांसाठी कोल्हापूर जिल्हा नेहमीच आकर्षण राहीला आहे. त्यामुळे देशभरातील पर्यटक याठीकाणी पर्यटनासाठी येत असतात. पर्यटकांना कोल्हापूरात यायचे झाल्यास पुणे जंक्शनहून सुरु असणारी पुणे-दिल्ली (दुरंटो एक्सप्रेस) लांब पल्याची गाडी पर्यटक व प्रवाशांच्या सोयीकरीता कोल्हापूरातून सुरु करण्यात यावी. तसेच कोल्हापूर ते अमृतसर ही नव्याने गाडी सुरु व्हावी, अशीही मागणी खासदार मंडलिक यांनी केली आहे.