ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘कोविशिल्ड’च्या डोसमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर 12 आठवड्यांनंतर दुसरा डोस दिला जाईल. ‘कोवॅक्सिन’ बाबतीतही असेच होईल. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
भार्गव म्हणाले की, देशात लसीची कमतरता नाही. जुलै किंवा ऑगस्टच्या मध्यापर्यंत आमच्याकडे दररोज एक कोटी लोकांना लस देण्यासाठी पुरेसे डोस असतील. डिसेंबरपर्यंत देशाच्या संपूर्ण जनतेचे आम्ही लसीकरण करु याचा आम्हाला विश्वास आहे.