वाळपई प्रतिनिधी
जागतिक स्तरावर करोना रोगाची महामारी निर्माण झाल्यानंतर वाळपई शहरांमध्ये भाजी व फळ विपेत्यांच्या दुकानांमध्ये बऱयाच प्रमाणात वाढ झालेली आहे. याचा प्रतिकूल परिणाम मंगळवारी वाळपई शहरात भरणाऱया आठवडी बाजारावर होताना दिसत आहे. गेल्या चार महिन्यापासून याआठवडी बाजारात ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्यामुळे आठवडी बाजारात पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यामुळे येणाऱया काळात वाळपई शहरातील आठवडी बाजार बंद तर होणार नाही ना अशा प्रकारची भीती याबाजारात सहभागी होणाऱया विपेत्यांनी व्यक्त केली आहे.
याबाबतची माहिती अशी की गेल्या अनेक वर्षापासून वाळपई शहरामध्ये मंगळवार हा आठवडी बाजार भरत असतो . वाळपई शहर त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ग्रामीण भागातील ग्राहक मोठय़ा प्रमाणात याबाजारामध्ये सहभागी होताना दिसत आहेत. वाळपई शहरातील आठवडी बाजार म्हणजे पूर्ण आठवडय़ामध्ये लागणाऱया वेगवेगळय़ा सामानाची खरेदी करण्यात येत असते. यामुळे वाळपई शहरातील आठवडी बाजारात मंगळवारी मोठय़ा प्रमाणात ग्राहकांची गर्दी होताना दिसत होती.
चार महिन्यांपासून बाजारावर परिणाम.
जागतिक स्तरावर करोना रोगाची महामारी निर्माण झाल्यानंतर वाळपई नगरपालिकेने शहरातील आठवडी बाजार काही प्रमाणात बंद केला होता. जवळपास एक महिना हा बाजार बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यानंतर याबाजाराची पुन्हा एकदा सुरुवात करण्यात आली. मात्र तेव्हापासून कोरोना रोगाच्या भीतीमुळे ग्राहकांनी शहरातील आठवडी बाजारात सहभागी होण्यास नकार दिल्यापासून याआठवडी बाजारावर परिणाम झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे विपेत्यांच्या धंद्यावर बऱयाच प्रमाणात परिणाम झाला असून शेकडो वर्षापासून वाळपई शहरात भरणाऱया आठवडी बाजाराच्या निमित्ताने मोठय़ा प्रमाणात होणारा धंदा आता कमी झाल्याच्या प्रतिक्रिया विपेत्यांनी व्यक्त केलेले आहेत.
शहरात भाजी,फळांच्या दुकांनाची संख्या वाढली.
मध्यंतरी वाळपई शहरातील आठवडी बाजार बंद झाला होता .त्यामुळे वाळपई बाजारात अपेक्षित प्रमाणात भाजी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे वाळपई शहरात अनेक ठिकाणी भाजीची दुकाने सुरू करण्यात आलेली आहेत. सदर दुकाने आजही सुरू असून शहरांमध्ये वाढलेल्या भाजीच्या दुकानांचा प्रतिकूल परिणाम आठवडी बाजार होताना दिसत आहे. मध्यंतरी बऱयाच भाजी विपेत्यांनी गावागावात फिरून भाजीविक्री करण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर ग्रामीण भागातील ग्राहकांनी सदर ठिकाणी भाजी विकत घेण्यावर भर दिल्यानंतर येथील भाजी व्यवसाय व आठवडय़ाच्या भाजी व्यवसायावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच प्रकारची परिस्थिती फळ विपेत्यांच्या बाजारावर झाल्याची पहावयास मिळत आहे.
दरम्यान यासंदर्भात गेल्या अनेक वर्षापासून आठवडी बाजारामध्ये भाजीची विक्री करणारे मोहंमद खान यांनी सांगितले की कोरोना रोगाच्या महामार्गामुळे वाळपई शहराबरोबरच अनेक बाजारामध्ये भाजी विक्रीच्या व्यवहारावर परिणाम झालेला आहे. यामुळे सध्यातरी धंदा चालविणे म्हणजे तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाळपई शहरातच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होण्यास शहरातील वाढत्या भाजीची दुकाने कारणीभूत आहे.
फळांची विक्री करणारे विपेते गुलशन अन्सारी यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना एकेकाळी वाळपई शहरातील आठवडी बाजार म्हणजे धंद्यासाठी चांगल्या प्रकारची संधी होती. आता मात्र शहरातील आठवडी बाजार पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे धंद्यावर बऱयाच प्रमाणात परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.