वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा माजी प्रथमश्रेणी क्रिकेटपटू अभय शर्माने भारतीय संघासाठी नियुक्त करण्यात येणाऱया क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदासाठी आपला अर्ज बीसीसीआयकडे पाठविला.
इंडिया अ 19 वर्षाखालील भारतीय संघ तसेच राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाला अभय शर्माचे यापूर्वी मार्गदर्शन लाभले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे विद्यमान क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर याचा कालावधी सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर संपत आहे. प्रमुख प्रशिक्षक रवि शास्त्राrचा कालावधीही या स्पर्धेनंतर संपणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयकडून विविध प्रशिक्षकांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे.
अभय शर्माने आपल्या कारकीर्दीत दिल्ली, रेल्वे आणि राजस्थान संघांचे प्रतिनिधित्व करताना 89 प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. इंग्लंडच्या दौऱयावर जाण्यापूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाला अभय शर्माचे मार्गदर्शन लाभले होते.