प्रतिनिधी /मिरज
तालुक्यातील खटाव येथील आरोग्य उपकेंद्राचे शटर उचकटून चोरट्यांनी मोबाईल आणि दागिने असा सुमारे 20 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. तशी फिर्याद आरोग्य सेविका राजश्री बाळगोंडा पाटील (वय 30) यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे.
राजश्री पाटील या खटाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विकास सेविका म्हणून कार्यरत असून, त्या आरोग्य उपकेंद्रात राहण्यास आहेत. शुक्रवारी रात्री 11 वाजता त्यांनी आरोग्य उपकेंद्र बंद केले. शटरला कुलूप लावले होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शटर उचकटून आत प्रवेश केला. व आतील सॅमसंग कंपनीचा मोबाईल, कानातील सोन्याचे झुमके असा 20 हजारांचा ऐवज चोरुन नेला.