बांगडे, झिंगे, टार्ली यांची विक्री अधिक : पापलेट सर्वात महाग
प्रतिनिधी / बेळगाव
कोकण किनारपट्टीला बसलेल्या ‘तौक्ते’ वादळाच्या फटक्मयानंतर मासळीची आवक कमी झाली. खोल समुद्रातील मासेमारी बंद झाल्याने सध्या खाडीतील मासळी बेळगावमध्ये दाखल होत आहे. मत्स्य खवय्ये मासळी खरेदीसाठी गर्दी करताना दिसत आहेत. सकाळी 10 पर्यंत कसई गल्ली येथील मच्छी मार्केट व कॅम्प येथील फिश मार्केट येथे खरेदीसाठी गर्दी होत आहे.
बेळगाव हा कोकणला लागून असणारा जिल्हा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोकणातून येवून स्थायिक झालेल्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बेळगावमध्ये दररोज मासळीला मागणी असते. परंतु लॉकडाऊन व त्यानंतरच्या ‘तौक्ते’ वादळामुळे आवक कमी झाल्याने खवय्यांमध्ये नाराजी होती.
मासळीचे दर वाढले
बेळगाव परिसरात सर्वाधिक मागणी बांगडय़ाला असते. सध्या कारवार येथून बांगडा येत आहे. प्रतिकिलो 200 ते 250 रुपये दराने बांगडा विक्री केला जात आहे. टार्ली 200, झिंगा (ओली कोळंबी) 300 ते 400 रु, सिल्व्हर फिश 200, स्टोअरेजचा पापलेट 600 तर ताजा पापलेट 800 ते 1000 रुपये किलो प्रमाणे दर लावण्यात आला आहे. दर काहीसे वाढलेले असतानाही नागरिक खरेदी करत आहेत. अजून 15 दिवसांनी ताजे मासे उपलब्ध होतील, असा अंदाज मासळी विपेते व्यक्त करीत आहेत.
अद्याप खोल समुदात मासेमारी सुरू नाही
मध्यंतरी आलेल्या वादळामुळे मच्छीमारी बोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अद्याप पूर्ण क्षमतेने खोल समुदातील मासेमारी सुरू करण्यात आलेली नसल्याने कारवार, सिंधुदुर्ग, गोवा व काही प्रमाणात रत्नागिरी या किनारपट्टी भागातून मासळी बेळगावमध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले.
–रफिक बेपारी (मासळी विपेते)