खानापूर / प्रतिनिधी
बाबरी विध्वंस प्रकरणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटीयारसह 32 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याबद्दल खानापूर तालुका बजरंग दलाच्यावतीने रविवारी येथील राजा शिवछत्रपती चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बजरंग दलाचे तालुका प्रमुख नंदकुमार निट्टूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यावर भाजप तालुकाध्यक्ष संजय कुबल, भाजपचे युवा नेते पंडित ओगले, बाळाराम सावंत, किरण यळळूरकर यांची भाषणे झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच भारतमातेचे पूजन केल्यावर फटाकडय़ाची आतषबाजी करुन मिठाई वाटण्यात आली.
यावेळी अमोल परवी, अनिकेत गावडे, राजू बिळगोजी, प्रितेश देसाई, किरण अष्टेकर, सुनिल नाईक, प्रकाश निलजकर, सुहास गुळेकर यासह बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.