तालुक्मयातून जाणारे अनेक राज्यमार्ग विकासाच्या प्रतीक्षेत : रस्ते अरुंद असल्यामुळे अपघातात वाढ
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयाच्या भौगोलिक क्षेत्रातून राज्यातील अनेक भागात जोडणाऱया मुख्य रस्त्यांपैकी सात राज्यमार्ग खानापूर तालुक्मयाच्या हद्दीतून उगम पावतात. त्यापैकी अनेक रस्त्यांचा विकास झाला असला तरी अनेक रस्ते विकासांपासून वंचित राहिले आहेत. अनेक राज्यमार्ग पावसाळय़ात उखडून गेले आहेत. रस्त्याच्या कडा तुटल्या आहेत. पण सार्वजानिक बांधकाम खात्याने पावसाळा संपून दोन महिने उलटले तरी विकासाची कामे हाती घेतली नाहीत. याकरिता अत्यंत दयनीय झालेल्या राज्य मार्गांची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी मागणी होत आहे.
तालुक्मयातून सुरवात होणाऱया या सात राज्य महामार्गामध्ये खानापूर-तालगुप्पा क्हाया हल्याळ, यल्लापूर, जांबोटी-जत व्हाया पारिश्वाड, एम. के. हुबळी, हेम्माडगा-सिंदनूर व्हाया बेकवाड-इटगी, नागरगाळी-कटकोळ व्हाया लालवाडी, चापगाव, इटगी, जांबोटी-पिरनवाडी ते रबकवी व्हाया कणबर्गी रोड, औराद-सदाशिवगड व्हाया अळणावर, रामनगर, गणेशगुडी तसेच बिडी-बेळवणकी व्हाया कित्तूर या राज्य मार्गांचा समावेश होतो. यापैकी पिरनवाडी ते जांबोटीमार्गे जाणारा रस्ता जांबोटी ते रबकवी, औराद, सदाशिवगड, बिडी, बेळवणकी व्हाया कित्तूर या रस्त्याचा विकास झाला आहे. पण उर्वरित राज्य मार्गावरील अनेक रस्ते मोठय़ा पावसात उखडून गेले आहेत.
खानापूर तालुक्मयाच्या विविध ठिकाणाहून सुरू होणाऱया सात राज्यमार्गापैकी एक दोन प्रमुख राज्य मार्गाचा विकास झाला आहे. पण उर्वरित चार ते पाच राज्य मार्ग विकासाअभावी मागे राहिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील खेडय़ाला जोडणारे हे रस्ते कधी विकसित होणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. तालुक्मयातील खानापूर-यल्लापूर व्हाया अळणावर या प्रमुख राज्यमार्गानंतर महत्त्वाचा समजला जाणाऱया जत-जांबोटी या राज्य मार्गाचा विकास सुरू आहे. जांबोटी येथून सुरू होणाऱया या राज्य मार्गाची खानापूरपर्यंत अपेक्षित विकास गंगा झाली नाही. या 13 किलोमीटर रस्त्यांपैकी बऱयाच ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मागील वषीच्या पावसाळय़ात अडचणीचा ठरलेला शंकर पेठवरील पूल आता विकसित झाला असला तरी रस्त्याचा विकास कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
खानापूर-पारिश्वाड रस्त्याचा विकास
खानापूर-पारिश्वाड ते एम. के हुबळीपर्यंत रस्त्यासाठी 20 कोटीच्या अनुदानातून विकासकाम सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून या रस्त्याचे अनुदान मंजूर होऊनही कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर गेल्या महिन्याभरापासून आमदार अंजली निंबाळकर यांनी या रस्ते विकासाला चालना दिली आहे.
खानापूर-हल्याळ रस्त्याची चाळण खानापूर तालुक्मयातील राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱया खानापूöतालगुप्पा या राज्य मार्गापैकी करंबळ कत्रीपासून कौदलपर्यंत तसेच लालवाडीपासून नंदगड, बिडी, कक्केरी ते लिंगनमठपर्यंत रस्त्याची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडून गेल्याने या राज्य मार्गावरील वाहतूक धोक्मयाची बनली आहे. तालुक्मयातून जाणारा आणखी एक राज्य मार्ग म्हणजे नागरगाळी-कटकोळ मार्गांचा समावेश आहे. हा रस्ता नागरगाळी ते नंदगड तसेच लालवाडी, चापगाव ते अवरोळी मार्गे इटगीहून कटकोळला जातो.