प्रतिनिधी /खानापूर
भाई डॉ. एन. डी. पाटील यांनी गेल्या चार दशकांपासून सीमालढय़ाचे सारथ्य केले. सीमावासियांना लढण्याचे बळ दिले. त्यांच्या निधनाने सीमावासीय एका लढवय्या सेनापतीला पारखे झाले आहेत. अशा शब्दात माजी आमदार दिगंबर पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. शिवस्मारक येथे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने डॉ. एन. डी. पाटील यांना शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्याध्यक्ष यशवंत बिर्जे म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढय़ात एन. डीं.चा आधार होता. त्यांचे शब्द कार्यकर्त्यांना आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा देत होते. प्रश्नासाठी त्यांनी दिलेले योगदान सीमावासीय कदापी विसरणार नाहीत.
भूविकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील म्हणाले, निष्कलंक आणि निःस्वार्थी नेतृत्व म्हणून एन. डी. पाटील यांनी लाखो सीमावासियांच्या घराघरात आणि मनामनात आदराचे स्थान निर्माण केले. त्यांच्या जाण्याने सीमाभाग बाप माणसाला पोरका झाला आहे.
यावेळी अनेक मान्यवर आपल्या भाषणात, अधुरे राहिलेले संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाई एन. डी. पाटील शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.
त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी प्रामाणिकपणे लढण्याची शपथ घेऊन कार्यकर्त्यांनी समितीशी एकनि÷ राहावे, असे म्हणाले. माजी आमदार दिगंबर पाटील यांनी डॉ. एन. डी. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सरचिटणीस आबासाहेब दळवी, विठ्ठल गुरव, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब शेलार, मराठी सांस्कृतिक प्रति÷ानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, नारायण लाड, डॉ. एम. भोसले, रमेश देसाई, शिवाजी पाटील, अशोक पाटील, रुक्माणा झुंजवाडकर आदींनी श्रद्धांजली वाहिली.