ग्रामीण पोलिसांकडून आणखी एकाला अटक : काही जणांचा तपास सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
केवळ 20 हजार रुपयांच्या देवाण-घेवाणीतून रणकुंडये (ता. बेळगाव) येथील एका युवकाचा भीषण खून करण्यात आला होता. याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी सोमवारी गावातील तिघा जणांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी आणखी एकाला अटक केली असून आता हा आकडा चारवर पोहोचला आहे.
नागेश पाटील (वय 31) याचा शनिवारी खून करण्यात आला होता. त्यानंतर बेळगाव ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली. याप्रकरणी सोमवारी तिघांना अटक केली. त्यानंतर आणखी एकाला मंगळवारी अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये प्रमोद सहदेव पाटील (वय 32), त्याचा भाऊ श्रीधर सहदेव पाटील (वय 28) व महेंद्र यल्लाप्पा कंग्राळकर (वय 21, तिघेही रा. रणकुंडये) या तिघांना सोमवारी तर किणये येथील भोमाणी कृष्णा डुकरे (वय 33) याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
या खूनप्रकरणानंतर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. शनिवारी मध्यरात्री रणकुंडये येथील नागेश भाऊसाहेब पाटील (वय 31) या युवकाचा भीषण खून करण्यात आला होता. टोळक्मयाच्या हल्ल्यात त्याचा भाऊ मोहन (वय 28) हाही जखमी झाला आहे. केवळ 20 हजार रुपये दिलेले पैसे परत मागितले म्हणून त्याचा खून करण्यात आला. या घटनेने रणकुंडयेसह परिसरात खळबळ उडाली होती. गेल्या काही महिन्यांपासून बेळगाव शहरासह तालुक्मयामध्ये खून प्रकरणांची मालिका सुरू असून पोलिसांसमोर हे मोठे आक्हान आहे.