ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताची पहिली मानवरहित अंतरीक्ष मोहीम कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. इस्त्रोच्या अंतरीक्ष आयोगाकडून या मोहीमेचा आढावा घेतला जात आहे.
सन 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने भारत स्वदेशी तंत्राने तीन अंतरीक्षांना अंतराळात पाठवणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये इस्रो मानवासहित अंतरीक्षात यान पाठवणार आहे. या मुख्य मोहिमेपूर्वी दोन मानवरहित यान डिसेंबर 2020 आणि जून 2021 मध्ये अंतरीक्षात पाठवण्यात येणार होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर 2020 मधील पहिली पहिली मानवरहित अंतरीक्ष मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
इस्त्रोच्या अंतरीक्ष आयोगाकडून यासंदर्भात आढावा घेतला जात आहे. इस्त्रोचे अध्यक्ष के सिवान हेच या आयोगाचे अध्यक्ष आहेत. आढावा घेतल्यानंतर सिवान यासंदर्भात अंतिम निर्णय जाहीर करतील.