तहसीलदार कार्यालयात नोंद : लग्नासाठी 40 जणांना परवानगीसह दहाच्या आत लग्न उरकण्याची अट
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात तहसीलदार कार्यालयातून परवानगी घेऊन 1930 जणांनी लग्न केल्याची नोंद तहसीदार कार्यालयात झाली आहे. केवळ तहसीलदार कार्यालयात नोंद करून परवानगी मिळविलेल्यांचा हा अधिकृत आकडा आहे. पण अनधिकृत विवाहांचा आकडा यापेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. कोरोना नियमांसह लग्न समारंभांना परवानगी देण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे पालन करत विवाह सोहळे संपन्न होताना दिसत आहेत.
दरवषी एप्रिल-मे दरम्यान मोठय़ा प्रमाणात लग्न सोहळे आयोजित केले जातात. मात्र, गतवर्षापासून लग्नसराईच्या हंगामातच कोरोनाने थैमान घातल्याने लग्न कार्यावर मर्यादा आल्या आहेत. शिवाय लग्नासाठी शासनाची परवानगीही बंधनकारक आहे. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यापासून लग्नासाठी तहसीलदार कार्यालयातून परवानगी दिली आहे. मागील महिन्यात तहसीलदार कार्यालयातून 1930 जणांनी परवानगी घेऊन लग्नगाठ बांधल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, शासनाने आता शुक्रवारीही कडक लॉकडाऊनची घोषणा केली असली तरी परवानगी घेतलेल्यांना लग्न करण्यास मुभा देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून उपलब्ध झाली आहे.
लग्न सोहळय़ांना होणारी गर्दी टाळण्यासाठी 40 जणांना परवानगी दिली जात आहे. शिवाय लग्नक् सकाळी 10 च्या आतच उरकण्याचा नवीन नियम जारी केला आहे. दरम्यान, लग्नाबरोबर धार्मिक कार्यक्रम, गृहप्रवेश व इतर कार्यक्रमांसाठी परवानगी दिली जात आहे. बेळगाव तालुक्मयातील नागरिकांना तहसीलदार कार्यालयात परवानगी देण्याची व्यवस्था केली आहे. दररोज 40 हून अधिक जण लग्न परवानगीसाठी अर्ज करत आहेत. प्रशासनाने विवाह सोहळय़ांना परवानगीची अट घातल्याने अर्ज करण्यासाठी व संमतीपत्र घेण्यासाठी वधू-वरांकडील मंडळींची वर्दळ दिसून येत आहे. मात्र, मागील महिन्याच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयातून मिळाली आहे. लॉकडाऊन काळात यादी पे शादी करणाऱयांची संख्या वाढली आहे. शिवाय काही लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. त्यामुळे यावर उपजीविका करणारे अडचणीत आले आहेत.
परवानगी घेतलेल्यांना शुक्रवारी लग्न करण्याची मुभा
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून परवानगी मिळविण्यासाठी संबंधितांची वर्दळ सुरू झाली आहे. लग्नांसह गृहप्रवेश इतर कार्यक्रमांसाठी परवानगी दिली जात आहे. शुक्रवारी कडक लॉकडाऊन जारी करण्यात आले असले तरी परवानगी घेतलेल्यांना लग्न करण्याची मुभा आहे. दिवसाला 40 हून अधिक जण परवानगी घेत आहेत. मात्र, घर सोडून मंदिर, मंगल कार्यालय, हॉटेल व इतर ठिकाणी लग्न करण्यास परवानगी नाकारली जात आहे.
– व्ही. मोहन (तहसीलदार ग्रेड-2)