शहर आणि परिसरात अशा प्रकारे गतिरोधकांची दुरवस्था झाली आहे.
प्रतिनिधी / बेळगाव
स्मार्ट सिटीअंतर्गत अनेक विकासकामांना चालना देण्यात आली खरी, पण अनेक समस्याही कमी झाल्या नाहीत. अपघात रोखण्यासाठी गतिरोधकांची निर्मिती करण्यात येते. मात्र, काही ठिकाणी गतिरोधकच अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीमुळे अनेकांनी तक्रारी केल्या तरी याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गतिरोधक कशासाठी? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
रहदारीवर शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आणि आरटीओंकडून गतिरोधकांची उभारणी वारंवार करण्यात येते. मात्र, त्याचे योग्य नियोजन नसल्याने आणि सरकारी निधी वाया कसा जाईल याकडे लक्ष देण्यात येत असल्याने शहर परिसरातील अनेक गतिरोधक असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे. मात्र, याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत असून तातडीने योग्य ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.
सरकार गतिरोधकांवर लाखो रुपये खर्च करूनही त्यांचा उपयोग होत नसल्याने अनेकांतून नाराजी व्यक्त होत असली तरी प्रशासनाने मात्र याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. कॉलेज रोडवर विविध महाविद्यालये आणि शाळा आहेत. या ठिकाणी गतिरोधक असणे गरजेचे आहे. मात्र, त्या ठिकाणी असलेले गतिरोधक नसल्याचे दिसून येत आहे.
न्यायालयात अशास्त्राrय पद्धतीने गतिरोधक उभे करण्यात आले. मात्र, त्यांची अवस्था पाहून वाहनधारकांना धोकाच अधिक वाटत आहे. अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या गतिरोधकांची काही कालावधीतच दुर्दशा झाली. आता पुन्हा तेथे गतिरोधकांची आवश्यकता असताना याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. शहरात अनेक ठिकाणी असे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी बसविण्यात आलेल्या गतिरोधकांचे केवळ लोखंडी बार राहिले असून वाहन पंक्चर होऊन अपघात घडल्याच्या घटनाही घडत आहेत.
ज्या ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता आहे तेथे ते बसविण्यात आले नाहीत. यामुळे वाहने जोरात ये-जा करत असतात. यातून अपघात घडू लागले आहेत. तरी या ठिकाणी शास्त्राrय पद्धतीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. शहराचा पसारा वाढतो आहे, तशा अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. धूम स्टाईलला अडसर म्हणून गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली. पण ती फार काळ तग धरू शकली नाही. मात्र, सर्वच गतिरोधकांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. याकडे लक्ष कोण देणार? असाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बेळगाव शहरात अनेक ठिकाणी स्मार्ट सिटीअंतर्गत कामे करण्यात आली आहेत. मात्र त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्यातच आले नाहीत. त्यामुळे अनेकांचा वाहनाचा वेग वाढू लागला आहे. परिणामी येत्या काळात तरी गतिरोधक उभे करण्याची गरज व्यक्त होत आहे. विविध ठिकाणी अशास्त्राrय पद्धतीचे गतिरोधक तयार करण्यात आल्याने अपघात घडू लागले आहेत. नको त्या ठिकाणी सरकारी पैसा वाया घालण्यातच धन्यता मानली जात आहे. यासाठी महापालिका व रहदारी पोलिसांनी संयुक्तपणे मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी होत आहे.
शहरात काही ठिकाणी गतिरोधक उंच असल्याने त्या ठिकाणी वाहनचालक घसरून पडू लागले आहेत. या गतिरोधकांवरून जात असताना वाहनचालकांना व मागे बसलेल्यांना त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे यापुढे तरी गांभीर्याने लक्ष देऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी तातडीने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.