आविष्कार महिला उद्यमशील संस्थेचा 23 वा र्धापनदिनसाजरा
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाने आपल्याला जगण्याची नवीन पद्धत शिकवली. तसेच आपले हेल्थ बजेट वाढविले. गरजा कमी करून जगायला शिकले पाहिजे. ही कोरोनाची सर्वात मोठी शिकवण आहे, असे विचार डॉ. आसावरी संत यांनी व्यक्त केले.
आविष्कार महिला उद्यमशील संस्थेचा 23 वा वर्धापन दिन सोमवारी दुपारी वरेरकर नाटय़ संघाच्या सभागृहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संत बोलत होत्या. व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर होत्या. डॉ. आसावरी संत यांनी ‘कोरोना ः काल, आज आणि उद्या’ या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले.
प्रारंभी आविष्कारच्या संचालिका वीणा तेंडोलकर व संस्थापक सदस्या डॉ. देवयानी देशपांडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शीतल गोगले यांनी दोन गीत सादर केली. सोनाली राणे यांनी स्वागतगीत सादर केले. निहारीका पुसाळकर यांनी आविष्कारने 2 महिन्यांत केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच कोरोनाकाळात गरजू महिलांना संस्थेने मदत केल्याचे नमूद करून विशेष यश मिळविल्याबद्दल सुनीता पाटणकर व स्नेहा गुडी, दिशा देशपांडे, प्राजक्ता बेडेकर, शीतल कट्टी, स्नेहा कुलकर्णी, संध्या पाटील, निधी भाटी यांचे अभिनंदन करण्यात आले.
प्रास्ताविक व स्वागत करताना संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा सुलभा खानोलकर म्हणाल्या, लॉकडाऊनने महिलांना अर्थार्जनाची किती गरज आहे हे अधोरेखीत केले. येत्या काळात पाककला, हस्तकला, कॉस्टिंग, विक्री कौशल्य, बँकिंग याबद्दल कार्यशाळा घेतल्या जातील.
यानंतर धनश्री मुरकुटे यांना आविष्कार उद्योगिनी पुरस्कार तर शिल्पा चौगुले यांना उषाताई गोगटे उद्योगिनी पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय करून देऊन हिमांगी प्रभू यांनी सूत्रसंचालन केले.