अवेळी अधिक प्रवास : नागरिकांना फटका
प्रतिनिधी/ बेळगाव
खासगी प्रवासी वाहने आणि ऑटोरिक्षांचे भाडे बेसुमार वाढत असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचा आधार बनलेली सिटी बससेवा सुधारण्याची गरज आहे. या सेवेत नव्या बस दाखल करून नागरिकांची सोय करण्याबरोबरच उपनगरी भागात जादा बसफेऱया वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आर्थिक भुर्दंडात असणाऱया परिवहन महामंडळाने आता गांभीर्याने याकडे लक्ष देऊन आर्थिक परिस्थिती सुधारण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सध्या सिटी बससेवा सुधारण्याची गरज सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागातर्फे जुन्या बस सिटी बससेवेत दाखल करून उपलब्ध होणाऱया नव्या बस शहरापासून 20 ते 25 कि.मी.वर असलेल्या ठिकाणांसाठी वापरल्या जावू लागल्या आहेत. यामुळे शहरांतर्गत नागरिकांना जुन्या बससेवेचाच आधार घ्यावा लागत आहे. सध्या या सेवेत दररोज 180 हून अधिक बस सेवा बजावत असून यापैकी 25 ते 30 बस मोडकळीस आल्या आहेत. याचा फटका त्यातून प्रवास करणाऱया नागरिकांना सोसावा लागत आहे.
महामंडळाला जेनर्म योजनेतून तब्बल 40 नव्या बस उपलब्ध झाल्या आहेत. या बस अद्ययावत सोयी-सुविधांनी सज्ज असून त्यांचा वापर सीटी बससेवेसाठी होण्याची अपेक्षा होती. मात्र, अजूनही म्हणाव्या तशा बस सोडण्यात येत नाहीत. परिणामी सुरुवातीच्या काळात या सर्व बस ग्रामीण भागाकडे वळविण्यात आल्या होत्या. त्यानंतर कालांतराने यातील काही बस पुन्हा शहरात फिरू लागल्या आहेत.
जेनर्म या बसेस मुचंडी तसेच खानापूर या मार्गांवर या बसचा वापर सुरू आहे. बेळगाव शहरात रिंगरुट तसेच वाढीव उपनगरांमध्ये नवे रुट निर्माण करून या आकारांनी लहान असलेल्या आणि जीपीआरएस व्यवस्थेने युक्त बसेसचा वापर होण्याची गरज आहे. मात्र, तसे होत नसल्याने नाराजीत वाढ झाली आहे. सध्या शहरांतर्गत भागात बसफेऱया वाढण्याची गरज आहे. प्रामुख्याने सकाळी व संध्याकाळी शाळा-कॉलेज तसेच कार्यालये सुरू व बंद होण्याच्या काळात पासधारक प्रवाशांची संख्या मोठी असते. अशा काळात मोजक्मयाच बस उपलब्ध राहू लागल्यामुळे इतर प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या कोरोनामुळे शाळा-कॉलेज बंद आहेत. मात्र येत्या दोन-तीन महिन्यात सर्व शाळा-कॉलेज सुरू होणार यात शंका नाही. त्यामुळे याकडे आतापासून परिवहनने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवास करणाऱया मंडळींची गैरसोय होऊ नये म्हणून ठराविक काळात वाढीव बसची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी वाढली आहे.