प्रतिनिधी / वैभववाडी:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या संचारबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी, यासाठी ग्रामपंचायतस्तरावर प्रशासनाला योग्य सहकार्य केले जात आहे. तालुक्मयातील अरुळे ग्रामपंचायतीमार्फत गावात होणारी लोकांची गर्दी विचारात घेऊन ग्रामपंचायतीमार्फत कोरोना बॅरिकेड्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
अरुळे गावामध्ये विनाकारण अरुळे व अन्य वाहनातून फेऱया मारणाऱयांचा अटकाव केला जात आहे. अरुळे गावच्या हद्दीमध्ये किराणा मालाची दुकाने, पोस्ट कार्यालय व नजीकच्या गावांचे रास्त धान्य दुकान आहे. त्यामुळे गावात गावाबाहेरील लोकांची गर्दी होत आहे. नजीकच्या गावातील रास्त धान्य त्या-त्या गावात देण्याची व्यवस्था छ. शिवाजी विकास सेवा सोसायटीने केल्याने गर्दीवर काही अंशी आळा बसला आहे. मात्र, खरेदीच्या नावावर विनाकारण गावात गर्दी करून फिरणाऱयांना चाप बसावा, यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने हे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. अरुळे ग्रामपंचायतीच्यावतीने यापूर्वी हॅण्डवॉश, साबण, सॅनिटायझर, मास्क याचे घरोघरी वाटप केले आहे. शिवाय संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण केले आहे. शासनाकडून दिल्या जाणाऱया सूचना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनीक्षेपकाचा वापरही करण्यात येत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतींकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. अरुळे सरपंच उज्ज्वल नारकर, ग्रामसेवक गणेश फुलसौंदर, तलाठी अक्षय लोणकर, उपसरपंच सुहास जांभळे, सदस्य महादेव कर्ले, सुनयना रावराणे, प्रज्ञा जाधव, ज्योती रावराणे व ग्रामस्थ याचे नियोजन करीत आहेत. कोरोना बॅरिकेड्स सांभाळण्यासाठी स्वयंसेवकांचे वेळापत्रक तयार करून अत्यावश्यक सेवेत अडथळा येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.