ऑनलाईन टीम / जयपूर :
राजस्थानमध्ये शुक्रवारी कोरोना संकटाचा मुकाबला करत असलेल्या अशोक गहलोत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी घोषणा केली की, आता राजस्थानमध्ये लावण्यात आलेला नाईट कर्फ्यू रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राजधानी जयपूरसह अन्य सर्व शहरे लवकरच नाईट कर्फ्यू मुक्त होणार आहेत.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, प्रदेशात चालू असलेला नाईट कर्फ्यू लवकरच संपवून टप्याटप्याने शिथिल केला जाईल, असे असले तरी हेल्थ प्रोटोकॉलचा अवलंब करणे अत्यावश्यक आहे. नाहीतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू शकते. त्यामुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
दरम्यान, व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, नाईट कर्फ्यूमुळे जयपूरमध्ये आतापर्यंत 100 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर पूर्ण प्रदेशात आतापर्यंत 700 कोटींचा खर्च झाला आहे. तसेच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, आता प्रदेशात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे, त्यामुळे नाईट कर्फ्यू रद्द करणे योग्य आहे. अशी मागणी देखील त्यांनी यापूर्वी केली होती.