ऑनलाईन टीम/तरुण भारत
भाजप आणि विश्व हिंदू परिषदेचं गाईंवर असलेलं प्रेम सर्वांनाच माहित आहे. गाईमध्ये ३३ कोटी देवता असतात, तसेच गाईपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वापर करून पंचामृत तयार करण्यात येतं, त्यामुळे गाईला राष्ट्रीय पशू घोषित केलं जावं, अशी मागणी सातत्याने केली जाते. अनेक राज्यांमध्ये तर गाईंच्या रक्षणासाठी गोहत्या कायदा देखील आहे. त्याच गाईच्या रक्षणासाठी आता लोकांनी तलवारी हातात घ्याव्यात, असं विधान विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी सरस्वती यांनी केलंय.
विहिंपने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना साध्वी सरस्वती म्हणाल्या की, “फोनवर लाखो रुपये खर्च करण्याऐवजी लोकांनी गायींच्या संरक्षणासाठी तलवारी आणि शस्त्रे खरेदी केली पाहिजेत.” साध्वी म्हणाल्या