नवी दिल्ली : सामनावीर अक्षदीप नाथच्या शानदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर कोटला मैदानावर उत्तरप्रदेश संघाने उपांत्य सामन्यात गुजरातचा 5 गडय़ांनी पराभव करत विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेची तब्बल 16 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. आता याच मैदानावर उत्तरप्रदेश आणि मुंबई यांच्यात रविवारी जेतेपदासाठी लढत होईल. या उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातचा डाव 48.1 षटकांत 184 धावांत आटोपला. त्यानंतर उत्तरप्रदेशने 42.5 षटकांत 5 बाद 188 धावा जमवित हा सामना जिंकला. उत्तरप्रदेश संघातील अक्षदीप नाथने 104 चेंडूत 8 चौकारांसह 71 धावा झळकविल्या. संक्षिप्त धावफलक : गुजराथ 48.1 षटकांत सर्वबाद 184 (हित पटेल 60, पीयूष चावला 32, यश दयाल 3-34, अकीब खान 2-22, अक्षदीप नाथ 1-29), उत्तरप्रदेश 42.5 षटकांत 5 बाद 188 (अक्षदीप नाथ 71, करण शर्मा 38, उपेंद यादव नाबाद 31).
Previous Articleनेमबाजी विश्वचषकासाठी कतारचे पथक भारतात दाखल
Next Article अडथळा आणल्याने लंकेचा गुणतिलके बाद, विंडीज विजयी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.