ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तयार झालेले गुलाब चक्रीवादळ आज रात्री उशिरापर्यंत ओडिशातील गोपालपूर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. सध्या हे चक्रीवादळ गोपालपूरपासून 180 किमी आग्नेयेस आहे. ते आंध्र प्रदेशातील कलिंगपटनम आणि ओडिशातील गोपालपूर दरम्यान संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत लँडफॉल तयार करण्याची शक्मयता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर पश्चिम बंगालच्या दिशेने सरकरणार आहे. 29 सप्टेंबरला हे वादळ पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करेल. सध्या हे चक्रीवादळ गोपालपूरपासून 180 किमी अंतरावर तर आंध्रप्रदेशमधील कलिंगपटनमपासून 240 किलोमीटरवर नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य प्रभावित क्षेत्रातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच बचाव पथकं तैनात करण्यात आली आहेत.