कुरनूल जिल्हय़ातील दुर्घटना
वृत्तसंस्था/ कुरनूल
आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्हय़ामध्ये एका औद्योगिक वसाहतीमध्ये अमोनिया गॅसची गळती झाल्याने कंपनीतील एका अधिकाऱयाचा मृत्यू झाला. नंदयाल येथील एसपीवाय ऍग्रो इंडस्ट्रिजमध्ये हा प्रकार झाल्याने महाप्रबंधक श्रीनिवास राव यांचा मृत्यू झाला. त्यांच्या सोबतचे चार कर्मचारी तेथून पळून गेल्याने त्यांचा प्राण वाचला, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.
कुरनूलचे जिल्हाधिकारी जी. वीरापांडियन यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी गॅस गळती रोखण्याचा प्रयत्न केला आहे. काही प्रमाणात गळती थांबली आहे. तसेच या प्रकल्पाच्या जवळपास राहणाऱयांना याचा कसलाही धोका नसल्याचे सांगितले. लोकांनी घाबरुन जाऊ नये तसेच विनाकारण घराबाहेरही पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.