पेठ वडगाव/प्रतिनिधी :
वडगाव नगरपरिषदेच्यावतीने शहरातील गोपाळ समाजातील बावन्न कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वीस लाख ऐंशी हजार रुपयांचा पहिला हप्ता प्रदान करण्यात आला. वडगाव नगरपरिषदेच्या हद्दीलगत असणार्या गोपाळ समाजातील बावन्न लोकांच्या प्लॉटवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना राबविण्यात येणार असून त्यासाठी लागणारी बांधकाम परवाना मंजुरी नगर रचना कार्यालयाकडून नुकतीच प्राप्त झाली व नगरपालिकेने तात्काळ त्यांचा घरकुलाचा पहिला हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग केला.
यावेळी या कुटुंबाना घरकुल मंजुरीची प्रत भटका विमुक्त संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे यांच्याकडे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे, महाआघाडीचे संघटक नगरसेवक अजय थोरात यांच्या हस्ते व उपनगराध्य्क्ष शरद पाटील, नगरसेवक संतोष चव्हाण, नम्रता ताईगडे, सुनिता पोळ, दिपक खरोशे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आली.
या घरकुल मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल त्या प्रभागाचे नगरसेवक संतोष चव्हाण, नम्रता ताईगडे, शरद पाटील यांच्या हस्ते भटका विमुक्त संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी शहरात युवक क्रांती महा आघाडीने कोट्यावधीची विकासकामे केली आहेत. यापुढेही आम्ही वडगाव शहरातील विविध विकास कामासाठी व नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू व यासाठी लागणारे सर्व सहकार्य युवक क्रांती महाआघाडीच्यावतीने करू असे सांगितले. शहरात तळागातील लोकांसाठी आम्ही विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत असा विश्वास युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी व्यक्त केला. नगरसेवक थोरात यांनी वडगाव शहरात एका वेळी इतक्या लोकांना मिळाला. या घरकुल योजनेचा लाभ युवक क्रांती महाआघाडीच्या सत्ता काळात मिळाला याचा मोठा आनंद होत आहे. या घरकुल योजनेच्या मंजुरीचे मोठे श्रेय भीमराव साठे यांचे असल्याचे सांगितले.
यावेळी भटका विमुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष भीमराव साठे म्हणाले, भटका विमुक्त समाजाच्या न्याय हक्कासाठी मी सदैव लढत आलो असून या तळागाळातील समाजाला शासनाच्या विविध विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. यापुढेही या समाजाला लाभ मिळवून देण्यासाठी कार्यरत राहणार आहे. आपण केलेल्या या सत्कारामुळे मला या समाजासाठी काम करण्याची नवी उर्जा मिळाली. यापुढे इतर समाजातील देखील तळागाळातील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करत राहीन अशी भावना व्यक्त केली.
यावेळी मुख्याधिकारी सुषमा कोल्हे, राहुल बुवा, अमिन तांबोळी तसेच संतोष ताईगडे, के.बी.मोरे, सरदार तिवडे, अमर कदम विश्वजीत साठे, युवराज पोवार संजय चौगुले बाळु पोवार दिनकर जाधव आदीसह गोपाळ समाज बांधव उपस्थित होते.