प्रतिनिधी/राय :
हिरव्या रंगाची नैसर्गीक शाल पांघरलेल्या गोव्याच्या निसर्गरम्य दृष्याला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करुन या राज्याच्या निसर्गाकडे खेळू नये असे आवाहन कुडतरीचे आमदार आलेक्स लॉरेन्सो यांनी आज पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या एका पत्रात आम. लॉरेन्सो यांनी हे आवाहन केले आहे.
भगवान महावीर अभयारण्य तसेच मोले राष्ट्रीय उद्यानातील अनेक झाडांची लॉकडावन काळात कत्तल करण्यात आलेली असल्याचे सोशल मिडीयावर चित्र झळकत आहे. महामारी रोखण्यासाठी लॉकडावन केले होते. मात्र या काळात गोव्यातील वन नष्ट करण्याचा काहींनी प्रयत्न केल्याचे दिसून येत असल्याचे याच पत्रात म्हटलेले आहे.
हॉस्पेट -तिनईघाट-वास्को हा नियोजीत रेल्वे मार्ग गोव्याच्या भगवान महावीर अभयारण्य आणि कर्नाटकाच्या दांडेली अभयारण्यातून जात असल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिलेले आहे.
वन मंत्रालयाचे मंत्री प्रकाश जावडेकर, रेल्वे मंत्री पियुश गोयल, आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनाही या पत्राच्या प्रति पाठविण्यात आलेल्या आहेत.