गोयंचो आवाजाचा निर्धार
प्रतिनिधी / पणजी
सध्या गोवा अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. सरकार विचित्र भांडवलदारांच्या नियंत्रणाखाली आहे. तसेच रिअल इस्टेट, कॅसिनो, मटका व्यवसायात अनेक आमदार गुंतले आहेत. सरकारने म्हादई कर्नाटकला विकली असून आता मोले प्रकल्प आणून गोवा नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गोव्याला वाचविण्यासाठी व संरक्षणासाठी चळवळ तीव्र करणार असल्याची माहिती गोयंचो आवाज संस्थेतर्फे पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला.
सध्या गोव्याची स्थिती चिंताजनक आहे. गोवा गोमंतकीयांच्या हातातून जाईल की काय अशी स्थिती निर्माण झाली. सरकार आता गोवा विकण्यासाठी काढला आहे. उद्योजकांचे गुलाम राजकीय नेते झाले आहेत. गोमंतकीयांची जमीन रूपांतर करून उद्योजकांकडे जात आहे. प्रशासनाची तत्त्वे राहिली नाहीत. ज्वकासकामांच्या नावावर डबल टॅकिंग केले जात आहेत. कर्नाटकासाठी कोळसा वाहतूक केली जाणार आहे. अदानीसाठी गोवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सरकार गोमंतकीयांची फसवणूक करत आहेत. प्रादेशिक आराखडाच्या टीडीआरच्या आश्रयाने त्यांनी हजारो कोटी रूपये जमा केले आहेत. विविध प्रकल्पातून कोटी रूपये जमवून उद्योजकांना फायदा करून देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप गोयंचो आवाज या संस्थेने केला.