बुधवार दि. 16 डिसेंबर ते मंगळवार दि. 22 डिसेंबर 2020
गेल्या 14 डिसेंबरला झालेल्या सूर्यग्रहणाविषयी माहिती का दिली नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. जगाच्या पाठीवर कोठेही ग्रहण झाले तरी ते जेथे दिसेल त्याच भागात ते पाळावे असा नियम आहे. जिथे ग्रहण दिसत नाही तेथे कोणतेही नियम पाळू नयेत, असा सिद्धांत आहे. सूर्यग्रहण हे केव्हाही दिवसा असेल तरच पाळावे, कारण ग्रहण म्हणजे अंधार व काळोख. रात्री जर सूर्यग्रहण झाले तर अंधार असल्यामुळे त्याचा विधिनिषेध पाळण्याची जरुरी नाही, कारण रात्री सूर्याला ग्रहण लागले काय अथवा न लागले काय काहीही फरक पडत नाही, तसेच चंद्रग्रहण हे देखील फक्त रात्री असेल तरच पाळावे. कारण चंद्र रात्री दिसत असल्याने त्याला लागलेले ग्रहण पाहता येते. दिवसा चंद्रग्रहण झाल्यास त्याचा काही प्रभाव जाणवत नाही. 14 तारखेचे सूर्यग्रहण रात्री असल्यामुळे ते मुद्दाम दिलेले नाही, पण सोशल मीडियावर त्याबाबत बरेच तर्कवितर्क दिसून येत होते. लोकांना भीती घातली जात होती. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम देखील निर्माण होत होता. फक्त धार्मिकदृष्टय़ा त्याचे महत्त्व त्यावेळी पाहावे पण, ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहण जगाच्या पाठीवर कोठेही झाले तरी त्या त्या राशीवर त्याचा कमी-जास्त प्रभाव जरूर पडतो. चंद्र, पृथ्वी व सूर्य हे सतत फिरत असल्यामुळे त्यांच्या प्रभाव कमी-जास्त होऊ शकतो. फक्त शापीत दोषांसाठी मात्र ग्रहणाचा विचार अवश्य करावा लागतो. चंद्र-सूर्य यांच्याप्रमाणेच बाकी इतर ग्रहात देखील ग्रहणे होत असतात, वास्तविक यांचाही विचार करणे आवश्यक आहे. दोन ग्रह एकाच राशीत असणे किंवा समोरासमोर विशिष्ट अंशात असणे हा देखील ग्रहणाचा भाग आहे. वास्तविक त्याचाही अभ्यास होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते पण, तसा प्रयत्न कुणीही करत नाहीत. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीनुसार ग्रहण कुठे पडते त्यानुसार त्याचे फलित ठरत असते. ग्रहणे मुख्यतः राहू-केतूशी संबंधित असल्याने काही ग्रहणे अत्यंत शुभ असतात. ती माणसाला सर्वोच्च पदावर नेतात, तर काही ग्रहणे माणसाला अक्षरश रसातळाला घेऊन जातात. त्यामुळे कोणते ग्रहण आपणास लाभदायक अथवा नुकसानकारक आहे ते पाहून त्यानुसार निर्णय घ्यावा लागतो. दैवीशक्ती समोर कोणाचे काहीही चालत नाही. परमेश्वराच्या मनात आले तर तुम्हाला तो मंत्री, खासदार, आमदार, पंतप्रधान करील आणि जर चुकल्यास एक वेळच्या अन्नालाही महाग करून ठेवील, असा संदेश ही ग्रहणे देत असतात. ग्रहणकाळात केलेले स्तोत्रवाचन अथवा मंत्रपठण अतिशय परिणामकारक असते. कित्येक महिने जपजाप्य व पूजापूजाअर्चा करून जे फळ मिळत नाही, ती पूजा ग्रहण कळत केल्यास त्याचे फळ ताबडतोब मिळते, असे अनुभव आहेत. दैनंदिन राहूकाळात पूजाअर्चा करू नका असे काही जण सांगत असतात, मग ग्रहण काळात करा म्हणून सांगतात, एक मोठे कोडे आहे. दररोजच्या राहू काळात कोणता शापित दोष निर्माण होतो व त्यासाठी काय करावे त्याची उपासना कोणती यावर बरीच माहिती मिळू शकते, पण ती डोळसबुद्धीने पहावी लागते. केवळ अंधश्रद्धेने पाहू गेल्यास त्याचा काही अनुभव येणार नाही.
मेष
अष्टमातील केतू-शुक्रामुळे अचानक धनलाभाच्या संधी येतील. रवि-बुध युतीमुळे नावलौकिक, प्रसिद्धी, प्रवास, मंगलकार्य या दृष्टीने अनुकूल काळ आहे. राशीस्वामी मंगळ बदलेपर्यंत कोणतेही आर्थिक व्यवहार जपून करा. कर्ज प्रकरणात गुंतू नका तसेच कुणाला जामीनही राहू नका. शनि-गुरुचा हर्षलशी होणारा केंद्रयोग काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील असे दाखवित आहे. शापितयोगाचा प्रभाव सुरू असल्याने फार दूरचे प्रवास करण्याचे टाळा. तसेच अधिक जागाही टाळण्याचा प्रयत्न करा.
वृषभ
काहीवेळा एखाद्या साध्या व्यक्तीने दिलेला सल्ला अत्यंत मोलाची भूमिका बजावतो. जे मोठय़ाना जमणार नाही ते या सल्ल्याने यश मिळवून देते, असा अनुभव या सप्ताहात येईल. 20 तारखेला उत्तरायण प्रारंभ होत आहे. या दोन दिवसात ज्या घटना घडतील, त्याचा परिणाम आगामी सहा महिन्यापर्यंत राहील. अष्टमातील रवि-बुधामुळे जिवावरची काही संकटे टळतील, पण तरीही कोणत्याही बाबतीत बेसावधपणा नको. काही जण बोलण्यात मन गुंतवून महत्त्वाच्या कागदपत्रावर सही घेण्याची शक्मयता आहे.
मिथुन
शुक्र-केतू ब्रह्मांड, मंत्रशक्ती व आध्यात्मिक बाबतीत अतिशय चांगले फळ देईल. सप्तमातील रवि-बुध यामुळे व्यवहारात काही मानी व्यक्तींचा संपर्क येईल. त्यांच्या बुद्धीचा वापर केल्यास जीवनात बरेच काही साध्य करू शकाल. मुळातच तुमची बौद्धिक रास असल्याने कुणाकडून काय शिकावे, हे तुम्हाला सांगावे लागत नाही. 20 तारखेला सुरु होणारे उत्तरायण तुम्हाला नोकरी, व्यवसायात बरेच काही देणार आहे. आगामी सहा महिन्यात त्याचा अनुभव येईल, पण काही बाबतीत भावनाशील न राहता व्यवहारिक राहिला तरच निभाव लागू शकेल.
कर्क
पंचमातील शुक्र-केतू या योगामुळे अनैतिक प्रेमप्रकरणे निर्माण करण्याची शक्मयता असते, त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे. ष÷ातील रवि-बुध योग आर्थिक बाबतीत काहीतरी निश्चित लाभ देऊन जाईल. 21 तारखेला सुरू होणारे उत्तरायण तुमच्या जीवनाला नवी कलाटणी देणारे आहे. भाग्योदय सूचक अनेक घटना घडतील. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी व्हाल. नोकरी व्यवसायात काही नवीन बदल घडू शकतात, पण त्याचबरोबर गाफीलपणा तसेच अति हौशीपणा काही बाबतीत धोकादायक ठरू शकेल. कोणते काम विचारपूर्वक करणे आवश्यक.
सिंह
21 तारखेला सुरु होणारे उत्तरायण तुम्हाला आगामी कालखंडात बरेच संस्मरणीय अनुभव देऊन जाईल. चतुर्थातील शुक्र-केतू योग राहत्या वास्तूत काही चमत्कारिक घटना घडवील. नको असलेल्या वस्तू काहीजण गळय़ात घालण्याचा प्रयत्न करतील. आर्थिक बाबतीत आपण सावध राहावे. कुत्री, विषारी सरपटणाऱया प्राण्यांपासून जपावे लागेल. नोकरीच्या बाबतीत एकाच वेळी दोन-तीन कॉल येण्याची शक्मयता आहे. अशा वेळी मन शांत ठेवून निर्णय घेणे उचित ठरेल. मंगळाचे भ्रमण धनलाभ दर्शक आहे. जे काम कराल त्यात आर्थिक फायदा होईल.
कन्या
सुखस्थानातील रवि-बुध योगामुळे काही व्यवहार गुप्तपणे करणे योग्य ठरेल. महत्त्वाच्या कामासंबंधी कोठेही वाच्यता झाल्यास त्यात यश मिळणार नाही किंवा ते काम लांबणीवर पडू शकते. पराक्रमातील शुक्र-केतू योग हा अनपेक्षितरित्या प्रेमभावनेत अडकण्याची शक्यता दर्शवितो. कोण कुठल्या रूपाने येऊन गैरफायदा घेईल सांगता येणार नाही. त्यासाठी माणसे ओळखून वागा. पंचमात शनि-गुरुमुळे काही बाबतीत धाडसी निर्णय घ्यावे लागतील, पण प्रसंगी ते निर्णय योग्य ठरतील.
तूळ
येत्या 21 तारखेला होणारे उत्तरायण आगामी सहा महिन्यात तुमच्या जीवनात बरेच महत्त्वाचे फेरबदल घडवेल. त्यात काही गोष्टी विचित्रही असू शकतात. धनस्थानातील शुक्र-केतू योग, आर्थिक विवंचना निर्माण करणारा आहे. पैसा भरपूर मिळाला तरी तो हाती राहीलच याची शक्मयता नाही. त्यामुळे कोठेही खर्च करताना योग्य विचारांती करा. रवि-बुधाचे भ्रमण तुमच्या कार्यकर्तृत्वाला पोषक असून मनातील अनेक गोष्टीना मूर्त स्वरूप प्राप्त करून देईल. राशीस्वामी शुक्र सध्या दूषित असल्याने कोणाच्या तरी सांगण्यावरून गैरसमज निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावध राहा.
वृश्चिक
राशीतील केतू-शुक्र ठाम निर्णय घेऊ देणार नाहीत. त्यामुळे महत्त्वाच्या कामाच्या बाबतीत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका. चारचौघांच्या सल्ल्यानेच कामे केल्यास उत्तम ठरेल. 21 तारखेला सुरु होणारे उत्तरायण आगामी सहा महिन्यापर्यंत तुम्हाला स्थलांतर, प्रवास, मंगलकार्य, दैवीकृपा यादृष्टीने अनेक बाबतीत मोठे यश देणारे आहे. धनस्थानातील रविबुधचा योग डोळय़ांचे विकार निर्माण करील. तसेच काही नव्या किमती वस्तू घेण्यासाठी खर्च करण्यास भाग पाडील. मानसिक स्थिती जरा चंचल राहील. राशीतील केतू मित्र मंडळीकडून फसवणूक दर्शवित आहे.
धनु
शुक्र-केतु बाराव्या स्थानातील इतर मार्गाने धनलाभ घडवून देईल, पण त्याचबरोबर काही नको ती प्रकरणेही निर्माण होतील. त्यामुळे आपण सावध राहणे आवश्यक आहे. राशीतील रवि-बुध तुमचे धाडस वाढवेल. अंगच्या कलागुणांना व कार्यकर्तृत्वाला प्रोत्साहन देणारे ग्रहमान आहे. विवाहाच्या प्रयत्नात असाल तर यशस्वी व्हाल. वास्तुच्या बाबतीत केलेल्या काही चुका महागात पडण्याची शक्मयता आहे. कायदेशीर बाबतीत कोणत्याही चुका करू नका. धनस्थानातील शनि-गुरु मुळे कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर पडेल.
मकर
लाभस्थानातील शुक्र-केतू योग हा धनलाभास अनुकूल असला तरी काही जणांकडून फसवणूक देखील दर्शवितो. त्यामुळे आपण सर्वबाबतीत संभाळून राहणे आवश्यक आहे. रवि-बुधाचे भ्रमण नोकरी-व्यवसायात काही अनपेक्षित प्रसंग निर्माण करील. तुमच्या हातून जर पुढच्या काळात काही चुका घडल्या असतील तर त्याचा फटका या आठवडय़ात बसू शकतो. 21 तारखेला होणारे उत्तरायण तुम्हाला आगामी सहा महिन्यात बरेच चित्रविचित्र अनुभव देऊन जाईल. मुलाबाळांच्या बाबतीत आठवडा अतिशय उत्तम आहे. जर एखादा नवीन व्यवसाय सुरू करणार असाल तर अनुकूल काळ आहे.
कुंभ
21 तारखेला सुरु होणारे उत्तरायण आगामी सहा महिन्याच्या काळात आर्थिक बाबतीत महत्त्वाच्या घडामोडी घडवील. नोकरी-व्यवसायात अनुकूल फेरफार होऊ शकतात. एखाद्याची जबाबदारी तुमच्या शिरावर पडण्याची शक्मयता आहे. लाभातील रवि-बुध म्हणजे हमखास यशाचे प्रतीक असं म्हणता येईल. कोणतेही काम यशस्वी होईल. साडेसातीचा प्रभाव जाणवणार नाही. आर्थिक बाबतीत मात्र तुम्हाला फार जपून राहावे लागणार आहे, कारण धनस्थानातील मंगळ खर्च वाढवण्याची शक्मयता असते.
मीन
आपल्याकडे जर चांगले विचार असतील व त्याला प्रोत्साहन देणारी एखादी व्यक्ती भेटल्यास त्याचे सोने करता येते. या सप्ताहात अशा अनेक संधी आपणास मिळतील. तुमच्या राशीतच होणारे उत्तरायण आगामी सहा महिन्याच्या कालखंडात तुमच्या व्यक्तिमत्त्वात महत्त्वाचे बदल घडविण्याची दाट शक्मयता आहे. शुक्र-केतुचे भ्रमण प्रवासात धोका, गुंगीचे औषध यामुळे नुकसान दर्शवीत आहे. राशीस्वामी गुरु आणि शनि लाभात असल्याने फार मोठे यश मिळेल, असे ग्रहमान दर्शवित आहे. पण जे काही कराल योग्य विचारांची करणे आवश्यक ठरेल.