प्रतिनिधी / सांगली
कवलापूमध्ये महिलांचे नवीन 25 बचत गट तयार झाले आहेत, लवकरच गावामध्ये शासनाच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसंघ स्थापन करता येणार आहे, यामुळे महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील, असा विश्वास मिरज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी व्यक्त केला.
कवलापूर येथील बचत भवनमध्ये राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी आर.एल.गुरव, सरपंच शुभांगी नलावडे, उपसरपंच सौरभ पाटील, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील, मिरज पंचायत समिती सदस्या सौ पूनम कोळी, ग्रामविकास अधिकारी सचिन पाटील आदी उपस्थित होते.
आप्पासो सरगर म्हणाले, हे अभियान वर्धा जिल्ह्यातील वर्धिनी यांच्या व पंचायत समिती मिरज व जिल्हा परिषद सांगली डी आर डी विभागामार्फत गेले 15 दिवस कवलापूर मध्ये चालू होते या अभियानाचे प्रमुख उद्धिष्ट महिलांचे बचत गट तयार करून त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे असा आहे या अभियानन अंतर्गत कवलापूर मध्ये महिलांचे 25 नवीन बचत गट तयार झाले आहेत लवकरच शासनाच्या मार्गदर्शना खाली एक ग्रामसंघ स्थापन करता येणार असल्याचे सरगर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. तसेच या अभियानात कवलापूर गावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद नोदवला.