प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनपासून ग्रामीण भागातील बंद असलेली अनेक गावांची बससेवा अद्याप बंदच आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होत असून फरफट होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांतील बस बंद आहेत. गावात मोजक्मयाच बसफेऱया सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
अनलॉकनंतर शहरासह ग्रामीण भागाच्या विविध मार्गांवर बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. आता हळूहळू प्रवाशांची गर्दी वाढू लागली आहे.
मात्र, अद्यापही काही ग्रामीण भागातील गावची बस बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्मयातील कोनेवाडी, मुचंडी, अष्टे, म्हाळेनट्टी आदी गावच्या बस बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
शाळा, महाविद्यालये व सहावी, सातवी विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यागम’ अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, अनियमित व अपुऱया बससेवेमुळे विद्यार्थीवर्गाचे हाल होत आहेत.
वस्तीची बससेवा विस्कळीत
ग्रामीण भागातील काही गावांना रात्री उशिरा वस्तीच्या बसेस धावतात. मात्र, लॉकडाऊनपासून ही वस्तीची बससेवा विस्कळीत झाली आहे.
त्यामुळे रात्री उशिराने प्रवास करणाऱया प्रवाशांचे हाल होत आहेत. विशेषकरून रात्री 8 नंतर बसफेऱया नसल्याने प्रवाशांना बसथांब्यांवर ताटकळत थांबावे लागत आहे.