किणये/ वार्ताहर
गेल्या चार पाच दिवसापासून हवामानात कमालीचा बदल झालेला आहे. पावसानीही विश्रांती घेतलेली असून कडक उन्ह दिसू लागले आहे. ग्रामीण भागात रात्रीच्यावेळी व पहाटेच्यावेळी धुके दिसू लागले आहे. या धुक्मयाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. निसर्गाची हे विंहगम दृश्य पाहून अनेकजण त्याचा आनंद घेत आहेत.
पहाटे पहाटे प्रवास करणाऱया वाहनधारकांना, मॉर्निंग वार्कसना व शेतकरी वर्गाना या दाट धुक्मयाचे दर्शन होऊ लागले आहे. भाजीपाला व इतर पिकांवर या धुक्मयामुळे परिणाम होणार असल्याची माहिती काही शेतकऱयांनी दिली आहे. मागील आठ दहा दिवसापूर्वी थंडीच्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र अलिकडे थंडी कमी भासू लागली आहे.
हवामानातील बदलामुळे आजाराच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कोरोनामुळे ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा म्हणाव्या त्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकत नाहीत.यामुळे एखादा साध्या प्रकारचा आजार आला तरीही बेळगावमधील मोठय़ा दवाखान्यामध्ये यायचे म्हटल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. धुक्मयामध्ये वाढ झाल्यास झाडांच्या मोहोरावरही त्याचा परिणाम होणार आहे.