कणकवली सभापतींची विभाग नियंत्रकांकडे मागणी
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गाडय़ा बंद असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. गणेशोत्सवानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱया भाविकांसाठी एसटी बसेसच्या नियमित गाडय़ा सोडण्यात याव्यात, अशी मागणी सभापती दिलीप तळेकर यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे केली आहे.
याबाबत तळेकर यांनी विभाग नियंत्रकांना निवेदन दिले असून यात म्हटले आहे, कोरोनामुळे बंद असलेल्या एसटी वाहतूकीमुळे लोकांची मोठी गैरसोय होत आहे. गणेश चतुर्थी सण असल्याने ग्रामीण भागातील भाविकांना खरेदीसाठी तसेच दैनंदिन व्यवहारासाठी सतत तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. तसेच तालुक्यातून पुन्हा मूळ गावी जाण्यासाठी त्यांना एसटी बसेसशिवाय अन्य कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामीण भागातील एसटीची सेवा पूर्वीप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करून सुरू करावी. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांचे हाल होणार नाहीत. त्यांची प्रवासाची गैरसोय दूर होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमित गाडय़ांव्यतिरिक्त काही जादा गाडय़ा सोडल्यास सर्व प्रवासी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून प्रवास करू शकतील. त्यामुळे कोरोनाचा फैलावही होणार नाही. तरी ग्रामीण भागातील बसेस सुरू करण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून व्हावी. याबाबत केलेल्या नियोजनाची प्रत मिळावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्राr, गणेश तांबे उपस्थित होते.