प्रत्येक उमेदवार म्हणतो मीच विजयी होणार : येत्या 30 तारीखला निवडणूक निकाल
वार्ताहर / खानापूर
ग्राम पंचायतीच्या निवडणुका संपल्या आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. येत्या 30 तारखेला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे आता तालुक्मयाच्या ग्रामीण भागामध्ये सर्वजण निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण भागात जिकडे-तिकडे नेमका कोण विजयी होणार, मतदारांनी विजयाची माळ कोणाच्या गळय़ात पडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
खानापूर तालुक्मयात तब्बल 544 जागांसाठी 1719 उमेदवार रिंगणात आहेत. अनेक गावांमध्ये चुरशीने मतदान झाले. एका जागेसाठी डझनभर उमेदवार एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे राहिले आहेत. अनेक ठिकाणी भावा-भावाचे नाते असूनही एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढविली आहे. तालुक्मयातल्या 276 मतदान केंद्रावर चुरशीने झालेल्या निवडणुकीत मतदानाचा टक्काही बऱयाचअंशी वाढल्याचे चित्र यावेळी दिसून आले. त्यामुळे सताधिकाऱयांना याचा धोका पोहचणार आहे. दि. 22 रोजी निवडणुकीच्या प्रत्येक मतदान केंद्रावर पाठीराख्यांची एकच गर्दी झाली होती. एखाद्या वॉर्डमध्ये 1 जागांसाठी बरेच उमेदवार उभे राहिल्याने मतदान केंद्रावर मत मागणीसाठी उमेदवारांची होणारी विनवणीही मतदारांना डोईजड झाल्याचे चित्र अनेक मतदान केंद्रावर दिसून आले. सकाळी 7 पासून सायंकाळी 5 पर्यंत मतदान केंद्रावर ठाण मांडून अनेकजण बसले होते. दिवसभर मतदान केंद्राच्या बाहेर अनेकांची पार्टीची, एकगठ्ठा मतदान करण्याची शर्यत सुरू होती. अनेक उमेदवारांकडून पैशांची उधळण करून होणारी चैनी यावेळच्या निवडणुकीत दिसून आली.
म. ए. समितीचा भगवा
अनेक ग्रामपंचायतीवर फडकणार शर्थीची निवडणूक तालुक्मयात पार पडली असली तरी एकाही मतदान केंद्रावर तसूभरही गोंधळ झाला नाही. तालुका प्रशासनाने निवडणुका प्रक्रिया यशस्वीपणे हाताळून आता अनेकांचे भवितव्य बंद पेटीत दडले आहे. त्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागून राहिली असून. आठवडाभर मात्र आता चर्चा रंगणार आहेत. यावेळची निवडणूक प्रामुख्याने कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली अथवा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली झाली नाही. त्यामुळे तालुक्मयात किती ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व राहणार याचीही आकडेमोड आत्ताच सांगणे कठीण झाले आहे. पण तालुक्मयाच्या मध्य व पश्चिम भागामध्ये मराठीबाणा कायम असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा अनेक ग्रामपंचायतीवर फडकणार असल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे येत्या 30 तारखेला निकालानंतरच खरे चित्र समोर येणार आहे.
कोण बाजी मारणार, याकडेच सर्वांचे लक्ष
उमेदवारांनी आपल्या विजयासाठी या ना त्या मार्गाचा अवलंब केला. पैसा आणि दारू याचाही मोठय़ा प्रमाणात वापर झाला. विशेषत: ग्रामीण भागातील तरुणाई तर दारू पैशालाच महत्त्व देत होती.
यामुळे निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार खरोखरच गावचा विकास करण्यासाठी उभे होते की, आणखी कशासाठी. याचीही उलटसुलट चर्चा सुरू आहे. बऱयाच ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती झाल्याने कोण बाजी मारेल, यांचे भविष्यही वर्तवणे कठीण झाले आहे.
तालुक्यातील प्रमुख ग्रा. पं. पैकी चापगाव, बिडी, पारिश्वाड, गंदिगवाड, इटगी, लोंढा, नंदगड, बरगाव, गर्लगुंजी आदी ग्रा. पं. मध्ये बरीच चुरस असल्याने त्या ग्रा. पं. वर कोण बाजी मारणार, याकडे ही सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पकाही ठिकाणी बऱयाच वर्षापासून ग्रा. पं. वर प्रस्तापित असलेले सदस्यही पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्या प्रस्तापिताना शह देण्यासाठी त्यांचे विरोधकही तितक्याच ताकदीनिशी लढत देत असल्याने ते प्रस्तापित आपला किल्ला राखणार की गडगडणार, याचे उत्तर मतमोजणीनंतरच मिळणार आहे.