प्रतिनिधी /बेळगाव
शहर परिसरातील मुख्य रस्त्यांसह बसस्थानक व इतर ठिकाणी कचरा साचून राहिला आहे. या कचऱयाची वेळेत उचल होत नसल्यामुळे कचऱयाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पश्चिम भागातील नागरिकांची सतत वर्दळ असणाऱया यंदे खुट आणि युनियन जिमखाना येथील चंदगड बसथांब्याजवळ कचरा साचून राहत असल्याने प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
शहरातील कचरा समस्या मार्गी लावण्यासाठी मनपा प्रशासन वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहे. मात्र शहरातील कचऱयाची वेळेत उचल होत नसल्याचे दिसत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर व गर्दीच्या ठिकाणी कचरापुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. सुका व ओला कचरा वेगळा करण्यासाठी कचरापुंडय़ा उपलब्ध केल्या आहेत. नागरिक मात्र याकडे दुर्लक्ष करून कचरा रस्त्यातच फेकताना दिसत आहेत. त्यामुळे रस्त्यावरच कचऱयाचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळत आहे. या रस्त्यावर फेरीवाले, हातगाडीवाले व बैठे विपेत्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रस्त्यावर अस्वच्छता पसरत आहे. या रस्त्यावर प्लास्टिक पिशव्या, कागद, इतर टाकावू वस्तु टाकल्या जात आहेत. परिणामी कचऱयाची वेळेत उचल होत नसल्यामुळे इतरत्र पसरला आहे. व्यवस्थापन होत नसल्याने शहराला कचरा समस्येला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील कचऱयाची त्वरित उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.