मागणीसह नवीन लागवडीमुळे ही स्थिती होण्याचे संकेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोविडच्या संसर्गामुळे जगासोबत देशातील विविध उद्योगधंदे अन्य व्यवसाय ठप्प झाले होते. याचा परिणाम सर्वत्र पहावयास मिळाला आहे. यामध्ये आसाममध्ये वाढत जाणाऱया चहावरही पडत आहे. राज्यामध्ये चहाची किंमत ही 60 टक्क्मयांनी तेजीत राहिली आहे. यासोबतच येत्या नवरात्र उत्सवापर्यंत चहाची किंमत आणखी वाढण्याची शक्मयता व्यक्त केली जात आहे.
चहाच्या किंमतीची स्थिती ही सध्या निर्माण होण्यामागे मागणी कमी होण्याचे कारण सांगितले जात आहे. गुजरातच्या टी असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश कारिया यांच्या माहितीनुसार आसाममधील चहा बागा मार्चमध्येच बंद झाल्या होत्या. तसेच याच कालावधीत चहाची पाने तोडण्यास कोणीही तयार होत नव्हते. यामुळेच चहा पावडरीचा पुरवठा मार्च ते जून या काळात न झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे.
मागील 55 वर्षात चहा व्यवसायाशी संबंधीत असणाऱया मनोज अनादकट यांनी म्हटले आहे, की चहाचा लिलाव 15 मार्चच्या आसपास सुरु होता. चहा बागा 15 डिसेंबरपर्यंत तीन महिन्यासाठी बंद करण्यात आल्या आहेत. कारण नवीन लागवड सुरु करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. चालू वर्षात सिलिगुडीमधील गार्डन टी व्हरायटीची किंमत 159 रुपयांनी वधारुन 241 रुपये झाली आहे. चहाच्या अन्य किमतीत वाढ होण्याचे संकेत असून ही वाढ 60 ते 70 टक्क्मयांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.