ऑनलाईन टीम / मुंबई :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. महाराष्ट्रात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील 24 तासात राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजेच 8641 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 2 लाख 84 हजार 281 इतकी झाली आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
काल एका दिवसात एकूण 5527 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 1 लाख 58 हजार 140 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.63 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात एकूण 1 लाख 14 हजार 648 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर
कालच्या एका दिवसात 266 जणांचा मृत्य झाला. तर आतापर्यंत 11,194 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर 3.94 टक्के इतका आहे.
आतापर्यंत 14 लाख 46 हजार 386 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 2,84,281 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 10 हजार 394 लोक होम क्वारंनटाईन मध्ये आहेत तर 42 हजार 833 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.