ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील चोवीस तासात देशात 3 हजार 970 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 85 हजार 940 वर पोहचली आहे. त्यापैकी 53 हजार 035 रुग्णांवर उपचार सुरू असून 30 हजार 153 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांनी घरी सोडण्यात आले आहे. तर आता पर्यंत एकूण 2 हजार 752 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
आता पर्यंत महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्णांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 1068, गुजरात मध्ये 606, मध्यप्रदेशमध्ये 239, पश्चिम बंगालमध्ये 225, राजस्थानमध्ये 125, दिल्लीमध्ये 123, उत्तर प्रदेशमध्ये 95, तेलंगणामध्ये 71, आंध्रप्रदेशमध्ये 48, कर्नाटकमध्ये 36, पंजाबमध्ये 32, जम्मू-काश्मीर आणि हरियाणामध्ये प्रत्येकी 11, बिहारमध्ये 7, केरळमध्ये 4, झारखंडमध्ये 3, ओडिशा, चंदिगड, हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी 3, आसाममध्ये 2 आणि मेघालय मध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.