चिकोडी, एकसंबा
यंदाच्या महापुराचा सर्वाधिक फटका निपाणी व चिकोडी तालुक्मयाला बसला आहे. निपाणी तालुक्मयातील 15 व चिकोडी तालुक्मयातील 4 गावांना पुराचा फटका बसला आहे. चिकोडी तालुक्मयातील 509 तर निपाणी तालुक्मयातील 5 हजार 991 नागरिकांना पुराची झळ बसली आहे. 35 हजार नागरिकांनी स्थलांतर केले आहे. स्थलांतरित पूरग्रस्तांसाठी चिकोडी तालुक्मयात 1 व निपाणी तालुक्मयात 24 अशी 25 निवारा केंदे सुरू करण्यात आली आहेत. चिकोडी तालुक्मयात दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
चिकोडी तालुक्मयात 60, निपाणी तालुक्मयात 28, रायबाग तालुक्मयात 20, अथणी तालुक्मयात 1, कागवाड तालुक्मयात 11 घरांची पडझड झाली आहे. 24 तासात झालेल्या पावसामुळे चिकोडी तालुक्मयातील 25 घरांची तर रायबाग तालुक्मयातील सहा घरांची पडझड झाली आहे. शनिवारी पावसाची संपूर्ण उघडीप असून चार-पाच दिवसांनंतर नागरिकांना सूर्यदर्शन झाले.
कृष्णेच्या तुलनेत यावषी लवकरच दूधगंगा नदीने धोकापातळी ओलांडली आहे. कृष्णेने अद्याप धोक्मयाची पातळी ओलांडली नाही. दोन मीटर पाणीपातळी वाढल्यास कृष्णाकाठाला पुराचा धोका संभवतो. दूधगंगा नदीने मात्र धोक्मयाची पातळी ओलांडली आहे. पाणीपातळी अशीच वाढत राहिल्यास सदलगा, मलिकवाड, एकसंबा आदी भागातील अनेक रस्ते बंद होऊन अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्मयता आहे. चिकोडी उपविभागात 30 बोटींची गरज असून नदीकाठच्या गावांत 27 बोटी उपलब्ध आहेत. चिकोडी तालुक्मयातील येडूर येथे एनडीआरएफ पथकाचे 21 जवान तर निपाणी येथे एसडीआरएफ पथकाचे 20 जवान बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
कृष्णा व दूधगंगेतून कल्लोळ येथे 3.11 लाख क्मयुसेक पाणी वाहून येत असल्याची माहिती प्रांताधिकारी युकेशकुमार यांनी दिली. सध्या दूधगंगेचे पाणी पात्राबाहेर व अनेक गावांमध्ये शिरले आहे. खरीप पिके तर पुराच्या पाण्याखाली बुडून नाश आली आहेत. कमी उंची असलेल्या उसातही पाणी शिरले असल्यामुळे ऊस पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. चिकोडी तालुक्मयातील कल्लोळ येडूर, मलिकवाड दत्तवाड, सदलगा बोरगाव, एकसंबा दानवाड हे सर्व बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
शनिवारी वाढत्या पाणीपातळीमुळे तहसीलदार प्रविण जैन यांनी कृष्णा काठावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रथम प्राधन्य देण्याचे आदेश पूरपरिस्थिसाठी नेमण्यात आलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱयांना दिले आहेत. तसेच पाऊस थांबला म्हणून कोणीही पूरस्थितीकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्मयता असून नागरिकांनी स्वतः हून आपली जनावरे घेऊन सुरक्षितस्थळी जाणे फायद्याचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीचा आढावा घेऊन जनवाड येथे निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. तसेच कडापूर व बसनाळगड्डे येथेही निवारा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. बहुतांश स्थलांतरितांनी आपापल्या नातेवाईकांकडे जाणे पसंद केले आहे. ज्यांना निवारा केंद्राची आवश्यक आहे अशांनी स्थानिक प्रशासनाला कळवून निवारा केंद्राचा लाभ घ्यावा असेही तहसीलदारांनी सांगितले. इंगळी, मांजरी, येडूर, येडूरवाडी, कल्लोळ, एकसंबा, सदलगा, जनवाड या नदीकाठच्या शेकडो नागरिक सुरक्षितस्थळी गेल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी दूधगंगा नदीतून 17600 क्मयुसेकने विसर्ग वाढला असून तो 51 हजार 920 इतका झाला आहे. तर राजापूर बंधाऱयातून 1 लाख 2 हजार 500 क्मयुसेकने विसर्ग वाढला असून तो 2 लाख 24 हजार 375 क्मयुसेक इतका झाला आहे. कल्लोळ कृष्णा नदीपात्रात 1 लाख 20 हजार 100 क्मयुसेकने पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली असून 2 लाख 76 हजार 295 क्मयुसेक इतका सध्या पाणी येत आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी 535.41 मीटर असून 2.1 मीटर इतकी पाणीपातळी वाढली आहे. तर दूधगंगेची पाणीपातळी 539.27 मीटर असून 2.5 मीटर इतकी वाढ झाली आहे.
धरणातून विसर्ग वाढला, पाणीपातळीतही वाढच
शनिवारपर्यंत धरणातील असणारा पाणीसाठा पाहता कोयना 82.80 टक्के 48576 क्मयुसेक विसर्ग, वारणा 93.2 टक्के 19750 क्मयुसेक विसर्ग , राधनगरी 93 टक्के 1400 क्मय?सेक विसर्ग, कण्हेर 76.24 टक्के 10159 क्मय?सेक विसर्ग , धोम 79.38 टक्के 10270 क्मयुसेक विसर्ग , काळम्मावाडी 75 टक्के 1000 क्मयुसेक विसर्ग, उमरोडी 70.5 टक्के 5434 क्मयुसेक विसर्ग, तारळी 88.74 टक्के 9863 क्मयुसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे. आलमट्टी धरणात 81.90 टीएमसी पाणीसाठा असून 1 लाख 58 हजार हजार 720 क्मयुसेक आवक होत असून 2 लाख 74 हजार 807 क्मयुसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.