प्रतिनिधी / कोल्हापूर
मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ व्हावे यासह विविध मागण्यांसाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली 700हून अधिक महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तब्बल चार तास ठिय्या मारला. जिल्हाधिकारी यांच्याकडून लेखी आश्वासन वेळेत न मिळाल्याने काही महिलांनी रास्ता रोको केला. यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी समजूत काढल्यानंतर महिला पूर्ववत आंदोलनस्थळी आल्या.
राज्याध्यक्षा दिव्याताई मगदूम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या मोर्चात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.