प्रतिनिधी/ पणजी
‘छात्रमित्र-अभ्यासपुस्तकम्’ या संस्कृत छात्रासाठी विशिष्ट हेतूने लिहिलेल्या अभिनव व वैशिष्टय़पूर्ण पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचे लेखन नीता प्रेमानंद कामत म्हामाई यांनी केले आहे.
या प्रकाशनप्रसंगी मुख्यमंत्र्यांसमवेत ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, तसेच अंजली अनिल कुंभार, अनिल भीमसेन कुंभार, आरव अनिल कुंभार यांची उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना आकर्षण वाटावे व सहज सुलभरित्या विषयाचे आकलन व्हावे या हेतूने प्रयत्नपूर्वक या पुस्तकाची रचना केली आहे. छात्राची विचारशक्ती व अभ्यासवृत्ती या पुस्तक अध्ययनाने वाढीस लागेल व गुणांकप्राप्तीसह व्यक्तिमत्त्व विकासासाठीही विद्यार्थ्यांना ते फार लाभदायक ठरेल, असे मनोगत लेखिका नीता प्रेमानंद कामत म्हामाई यांनी व्यक्त केले.