प्रतिनिधी/ सातारा
कोरोना बाधितांचा आकडा वाढत असून यांचा संसर्ग रोखण्यासाठी साताऱयात पुन्हा जनता कफ्यु होणार अशी अफवा पसरवली जात आहे. या अफवेमुळे घर ते बाजारपेठ असे चर्चेला उधान आले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून रोजगाराचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर झाला आहे. यामुळे सर्वत्र संभ्रम अवस्था असून प्रशासनाने कफ्यु जाहीर केला तरी 100 टक्के शक्य आहे का ? अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
मार्च महिन्यात लागू झालेल्या लॉकडाऊनचे नियम शिथील झाले आहेत. सातारा शहरासह जिह्यात जनजीवन पुन्हा पर्ववत होत आहे. मात्र, कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने कोरोनाची धास्ती सर्वत्र पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर साताऱयात पुन्हा ‘जनता कफ्यु’ होणार का ? अशी चिंता सातारकर नागरिकांना लागून राहिली आहे. जिह्यातील काही तालुक्यात गावकऱयांनी ‘जनता कफ्यु’ ची भूमिका घेतली आहे. याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. या पाठोपाठ साताऱयातही ‘जनता कफ्यु’ होणार अशी अफवा वारंवार पसरवली जात आहे.
यामुळे सर्वसामान्य नागरिक ते व्यापारी वर्गात चर्चेला उधान आले आहे. ‘जनता कफ्यु’ नको म्हणत काही लोक नियमांचे पालन करताना दिसत आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘जनता कफ्यु’ योग्य वाटत असला तरी बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. कफ्युचा जास्त फटका हातवर पोट असणाऱयावर होत आहे. व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडत आहे. यामुळे नियमांचे पालन करतो असे म्हणत ‘जनता कफ्यु’ ला विरोध होत आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे अफवांना बळी पडु नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.