म्हाऊस पंचायत जाहीर सभेत आश्वासन.
प्रतिनिधी /वाळपई
भाजप सरकारवर जनतेचा विश्वास आहे. त्यांना दिलेली आश्वासने आतापर्यंत पूर्ण करण्यावर प्रामुख्याने भर दिलेला आहे. येणाऱया काळात जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे प्रयत्न करण्यात येतील. दिलेल्या आश्वासनाबाबत कोणतीच चिंता करण्याची गरज नाही. सत्तरी तालुक्मयातील जनतेने आतापर्यंत चांगल्या प्रकारचे सहकार्य स्वाभिमानीवृत्तीने दाखवून दिलेले आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता फक्त विकासावर भर देण्याचे आजपर्यंत आपले प्रयत्न राहिलेले आहेत, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे. सत्तरी तालुक्मयातील म्हाऊस पंचायत क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पंचायतीचे सरपंच या वंदना गावस, उपसरपंच कृष्णा गावकर सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, उदय सावंत पंचायत सभासद अशोक गावकर ,बाळकृष्ण सावंत,विठोबा वरक ,कुंजल गावास सोमनाथ काळे दिवस्थानचे प्रमुख बारकेलो गावकर ,भिको गावकर ,झिलू गावकर व इतरांची खास उपस्थिती होती.
आज प्रत्येकाच्या मनामध्ये एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांच्या रोजगाराच्या समस्या घेऊन आपल्याकडे येत आहे.त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असलेल्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीसुद्धा कोणत्या प्रकारची चिंता करण्याची गरज नसून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण वेगवेगळय़ा माध्यमातून करीत आहे .अनेक वेळा आपल्यावर अनेक प्रकारचे आरोप होतात मात्र आपले कार्य सत्तरी तालुक्मयाच्या जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी आहे .एकेकाळचा सत्तरी तालुकका व आताच्या सत्तरी तालुक्मयामध्ये जमीन-अस्मानचा फरक जाणवत आहे. एकेकाळी सत्तरी तालुक्मयांमध्ये गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता आज प्रत्येक गावांमध्ये हॉटमिक्स रस्त्याची सुविधा निर्माण झालेले आहे .प्रत्येक गावांमध्ये सरकारी शाळा चांगल्या प्रकारचा आकार घेऊ लागले आहेत. आरोग्याच्या सुविधा जनतेच्या दारापर्यंत पोहोचलेले आहेत .अशा विविध स्वरूपातून विकासाची संकल्पना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्यात येत आहे. ामुळे येणाऱया विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मागे खंबीरपणे उभे रहा व विकासाचा मार्ग आणखी सुकर करा अशा प्रकारचा संदेश यावेळी त्यांनी दिला.
विश्वजीत राणेचे खंबीर नेतृत्व–देवयानी गावस.
जि.प.सभासद देवयानी गावस यांनी यावेळी बोलताना विश्?वजित राणे यांच्यासारखे नेतृत्व मिळणे कठीण आहे .प्रत्येकाच्या जीवनाशी समरस होऊन त्याने अनेकांच्या अनेक प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी आतापर्यंत चांगल्या प्रकारचे योगदान दिले आहे. सत्तरी तालुक्मयाची परिस्थिती आज पूर्णपणे बदलू लागलेली आहे. प्रत्येकाला स्वाभिमान बाळगणे अशा प्रकारचा विकास तालुक्मयामधून होत आहे. अशा नेतृत्वमागे खंबीरपणे उभे राहणे आज अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. दाबे गावात नेटवर्कची सुविधा प्रंलबित राहिलेली आहे. यामुळे शैक्षणिक स्तरावर मुलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे .याची विशेष दखल घेऊन सदर ठिकाणी नेटवरची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
सरपंच वंदना गावस याचा विकासाचा पाढा.
पंचायतीच्या सरपंच वंदना गावस यांनी यावेळी बोलताना विश्वजित राणे व प्रतापसिंह राणे यांच्या माध्यमातून पंचायतिच्या विकासाला कशा प्रकारे चालना प्राप्त झाली. या संदर्भाचा पाढा वाचला. ाउस पंचायत क्षेत्रातील म्हाऊस गावांमध्ये सौंदर्यीकरण करण्याचा प्रकल्प रखडलेला आहे. त्या संदर्भात विशेष लक्ष देण्याची विनंती त्यांनी विश्?वजित राणे यांना केली. त्याप्रमाणे झरमे गावांमध्ये कोटय़ावधी खर्च करून क्रीडा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. पंचायत क्षेत्राच्या वेगवेगळय़ा गावांमध्ये हॉटमिक्स डांबरीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असून याला मान्यता मिळाल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. नेटवर्क सुविधा या संदर्भात मात्र त्यांनी खंत व्यक्त करून या संदर्भात विश्?वजित राणे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची विनंती केली. म्हाऊस पंचायत क्षेत्रातील आज दाबे व झरमे दोन्ही गाव नेटवर्कापासून वंचित राहिलेले आहेत .यामुळे शैक्षणिक स्तरावर मुलांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले व याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती केली.
म्हाऊस गावाच्या विकासाला चालना अशोक गावकर
स्थानिक पंचायत सभासद अशोक गावकर यांनी यावेळी बोलताना गावामध्ये आज अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण झालेले आहेत.या गावात निर्माण झालेली नेटवर्कची सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेला टावर यासंदर्भात त्यांनी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे पंचायतीसाठी नवीन इमारतीचे काम सुरू आहे .त्यामुळे येणाऱया काळात या पंचायत इमारतीमध्ये अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण होणार आहेत. याचा स्थानिकांना चांगल्या प्रकारचा लाभ होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या गावातील रोजगाराची समस्या सोडविण्यात दृष्टिकोनातून प्राधान्याने प्रयत्न करावेत अशा प्रकारची विनंती यावेळी त्यांनी केली.
भाजपाच्या माध्यमातून विकासाला चालना-सोमनाथ काळे
नागवे प्रभागाचे पंच सोमनाथ काळे यांनी यावेळी बोलताना गेल्या पाच वर्षांत पंचायतीच्या विकासाला चांगल्या प्रकारची त्यांना प्राप्त झालेली आहे .नागवे गावांमध्ये आज हाँटमिक्स रस्ता सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची समस्या यामुळे अनेक वर्षे नागरिकांसाठी निर्माण झालेली परिस्थिती बदललेली आहे. भाजपा सरकारने सर्वसामान्य घटकांच्या विकासासाठी केलेले कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे निवेदन केले. त्याचप्रमाणे येणाऱया काळात गावातील बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी विश्?वजित राणे यांनी प्रामुख्याने प्रयत्न करावेत अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीला व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे धनाजी माजीक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.