प्रतिनिधी /मडगाव
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री सव.भाऊसाहेब बांदोडकर हे महाराष्ट्रवादी पक्षातून झाले. त्यांनी सदैव सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्य केलेले आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी सर्व क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे काम केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची गरज आहे. कारण काँग्रेस व भाजप सरकारने तोडफोडीचे राजकारण केलेले आहे. पुर्वी ज्या पद्धतीने काँग्रेस तोडफोडीचे राजकारण करत होते. त्याचपद्धतीने भाजप सुद्धा तोडफोडीचे राजकारण करत आहे. हे सर्व बंद होणे गरजेचे आहे. तेव्हा जनतेने येणाऱया विधानसभेच्या निवडणूकीत मगो पक्षाचे 21 आमदार निवडून देऊन सत्तेवर आणण्याचे काम करावे असे मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी सांगीतले.
मडगाव येथील लोहिया मैदानावर राज्यात राजकीय क्रांती घडवून आणण्याकरीता आयोजीत केलेल्या कार्यक्रमा दरम्यान प्रसार माध्यमांशी ते बोलत होते.
मगो पक्षाने सदैव चांगले सरकार देण्याचे काम केलेले आहे. मगोने कोणत्याही समाजावर कधीही अन्याय होऊ दिला नाही. ह्या पक्षाला सर्व धर्माच्या लोकांनी पसंद केलेले असून ख्रिस्ती धर्मातील लोकांनी सुद्धा या पक्षाला मतदान केलेले आहे. भाजप सरकारने गोव्यात बिहार सारखी परिस्थीती निर्माण केलेली आहे. त्यामूळे हे सर्व थांबवण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा मगो पक्षाला साथ देण्याची गरज आहे. तसेच भाजप व काँग्रेस पक्षासाठी राज्यात दरवाजे बंद करण्याची वेळ आलेली आहे. आता जनतेने प्रादेशिक पक्षांनाच पाठिंबा देण्याचे आवाहन ढवळीकर यांनी यावेळी केले.
मडगाव येथील लोहिया मैदानावरुन ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यात आम्हाला यश प्राप्त झालेले आहे. कोकणी- मराठी आंदोलन, विद्यार्थ्यांकरीता बसप्रवासासाठी 50 टक्के सवलत अशा विविध प्रकारच्या आंदोलनात यश लाभलेले आहे. मगो पक्षा येणाऱया विधानसभेच्या निवडणूकीत 22 ठिकाणी निवडणूक लढवणार. तसेच मगो पक्षाने सदैव चांगले नेते तयार केलेले आहेत. ज्या नेत्यांनी मगो पक्ष सोडून इतर पक्षात प्रवेश केला अशा नेत्यांना जनतेने धडा शिकवलेला आहे. मगो पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांची अत्यंत वाईट परिस्थीती निर्माण झाली असल्याचे ढवळीकर यांनी यावेळी सांगीतले. रवी नाईक यांना फोंडय़ातील व मडकई येथील लोकांनी धडा शिकवलेला आहे. आता पुन्हा एकदा ते मडकईमधून निवडणूक लढवू इच्छूक असेल तर तो त्यांचा निर्णय असेल. कारण प्रत्येकाला आपल्याला हव्या त्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचा अधीकार आहे. त्यावर आणखी भाष्य करुन काहिच फायदा नाही. तसेच जनतेने कोणत्या एक पक्षाला पूर्ण बहुमताने निवडून आणावे. तेव्हा युतीचा प्रश्नच येणार नाही. राज्यातील जनतेने काँग्रेस व भाजपचे सरकार पाहिलेले आहे. मगो पक्षाचे सरकार सत्तेवर असताना केलेल्या कार्याची दखल जनतेने घेण्याची आज गरज आहे. तेव्हा युवकांनी मगो पक्षाला साथ देऊन पक्ष बळकट करण्याचे आवाहन ढवळीकर यांनी यावेळी बोलताना केले.