ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशात आता जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यास राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) अटक करण्यात येणार आहे. तसेच त्यांची संपत्तीही जप्त करण्यात येणार आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांसाठी उत्तरप्रदेशात कठोर कायदा आहे. मात्र, तरी देखील उत्तरप्रदेश आणि दिल्लीत एक हजाराहून अधिक जणांचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याची बाब समोर आली. त्यानंतर योगी सरकारने जबरदस्ती धर्मांतर करणाऱयांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा खाली अटक करा आणि त्यांची संपत्तीही जप्त करा, असे आदेश दिले आहेत.
दरम्यान, यापूर्वीच उत्तरप्रदेशात लव जिहादविरोधात करण्यात आलेल्या कायद्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये पीडितेला आर्थिक मदतीची आणि दोषींना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.